Education News  Saam TV
लाईफस्टाईल

Education News : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बातमी; परीक्षेत मिळणार नाहीत अतिरिक्त गुण, वाचा कारण

Cancellation of Extra Marks : विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षात

Ruchika Jadhav

१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. आजवर विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळणारे अतिरिक्त गुण आता रद्द करण्यात आले आहेत. कारण अतिरिक्त गुण देणाऱ्या संस्थांपैकी काही संस्थांकडून बनावट आणि पैसे घेऊन प्रमाणपत्र मिळत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे ११० संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

३०० रुपयांत प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळांमध्ये अभ्यासातील विषयांव्यतिरिक्त विविध विषयांच्या परीक्षा आणि स्पर्धा घेतल्या जात होत्या. शाळेत येणाऱ्या या संस्था ३०० रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र बनवून देत आहेत, असा आरोपही करण्यात आला होता. आरोप झाल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर आता या संस्थांची मान्यता रद्द झालीये.

कला, क्रीडा, सांस्कृतीत, लोककला अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या आणि नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे दिली जात होती. त्यासह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना जास्तीचे मार्क देण्यात येत होते.

विद्यार्थ्यांचे हे जास्तीचे मार्क पैसे घेऊन दिले जात असल्याचं समजल्यानंतर गुणांचा बाजार आता बंद झाला आहे. गुणांचा बाजार बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर आणि टक्केवारीवर देखील याचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. आज बारावीचा निकाला जाहीर होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. अशात आता या निर्णयाने विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT