Chanakya Niti On Money Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Money : अचानक मिळालेल्या पैशांनी करू नका ही 5 काम, अन्यथा गरीबी यायला वेळ लागणार नाही

Spending Money : आचार्य चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. ते भारताचे एक महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लष्करी रणनीतीकार होते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. ते भारताचे एक महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लष्करी रणनीतीकार होते. त्यांनी समाज, राष्ट्र, राजकारण आणि लष्करी क्षमता यावर नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला होता, ज्याला चाणक्य नीती असे म्हणतात. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी अशा अनेक मौल्यवान गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या शेकडो वर्षांनंतर आजही पूर्णपणे आपल्या जीवनावर लागू होतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पुस्तकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा (Money) मिळतो तेव्हा त्याने या 5 कामना चुकूनही करू नये. असे न केल्यास त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

पैशाच्या बाबतीत ही चूक कधीही करू नका

अनेक वेळा पैसे मिळाल्यावर लोक (People) व्यर्थ खर्च करू लागतात. अशी चूक तुम्ही कधीही करू नये. लोक अशा लोकांना टाळतात आणि त्यांच्यापासून अंतर राखू लागतात. त्याऐवजी, तो पैसा स्वतःच्या आणि इतर लोकांच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. यामुळे देवदेवता प्रसन्न होतात.

हुशारीने पैसे खर्च करा

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हाही तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा तुम्ही ते हुशारीने खर्च करावे. संकटकाळात पैसा हाच चांगला मित्र (Friend) असतो. अशा परिस्थितीत जे लोक आपले पैसे सुरक्षितपणे ठेवत नाहीत त्यांना वाईट काळात अडचणीचा सामना करावा लागतो.

इतर लोकांसमोर चर्चा करू नका

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जेव्हाही तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांशी चर्चा करू नका. यावर चर्चा केल्याने चोर आणि शत्रू सक्रिय होतात आणि ते तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळे याबाबत मौन बाळगा आणि तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेबाबत सावध राहा.

इतरांचा अपमान करू नका

पैशाचा वापर इतरांना अपमानित करण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते आणि घरात गरिबी येते. त्यामुळे पैशाचा वापर सकारात्मक पद्धतीनेच केला पाहिजे.

कधीही अहंकारी होऊ नका

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा मिळतो तेव्हा त्याने कधीही गर्व करू नये. संपत्ती दाखवल्याने शत्रूंची संख्या वाढते आणि लोक त्यांच्यावर चिडायला लागतात. त्याचा अतिउत्साही कधी कधी त्याला भारावून टाकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT