More Excessive Water Drink : आपलं शरीर हे जवळपास 70 टक्के पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी एका दिवसाला किमान तीन ते चार लिटरच द्रव्य पदार्थ सोबत पाणी प्यावं, तसेच स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त पाणी पिणे टाळावं असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
वाढत्या उन्हाळ्यात आपण सतत पाणी पितो. या दिवसात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर (Doctor) देतात. उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्ती हा एका दिवसात जास्तीत - जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, जास्त पाणी पिणे हे तुमच्या जीवावर देखील भेतू शकते, त्यामुळे तुम्ही कोमात जाण्याची भीती वाढू शकतो. असे मत सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका शेरावत यांनी केला आहे.
या दिवसात काही जण स्वतःचे फिटनेस जास्त मेंटेन करण्यासाठी त्याही पेक्षा जास्त पाणी पितात. त्यामुळे त्यांना अंगावर सूज येणे, मळमळ - उलट्या होणे, डोकेदुखी (Headache) किंवा थकवा येणे, लो ब्लड प्रेशर होणे, ऊर्जेचा अभाव वाटणे, स्नायू कमकुवत होणे तसेच चिंता किंवा राग येणे किंवा अचानक कोमात जाण्याचे धोके उद्भवू शकतात असा दावा न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका शेरावत यांनी केला आहे. मात्र अशा प्रकारची धोकादायक परिस्थिती खूपच कमी व्यक्ती सोबत घडू शकते असं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच मत आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.