Chanakya Niti On Students Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Students : विद्यार्थ्यांनी या गोष्टी अंगिकारल्या तर करिअरमध्ये मिळेल नक्कीच यश, जाणून घ्या

Students Success : जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर त्याचे जीवन यशस्वी होऊ शकते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील महान शिक्षकांपैकी एक होते. आचार्य चाणक्य हे खूप दूरदर्शी आणि महान रणनीतिकार होते. त्यांनी चाणक्य नीती सारखा महान ग्रंथ लिहिला आहे, ज्यामध्ये लोककल्याणाचे मुद्दे सूत्रांच्या रूपात आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर त्याचे जीवन यशस्वी होऊ शकते. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की विद्यार्थी जीवन हे तपश्चर्यासारखे आहे. आजच्या चिंतनात आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांबद्दल सांगितले आहे.

चाणक्य नीती म्हणते की विद्यार्थ्यांचे जीवन (Life) अनमोल आहे. त्याचे महत्त्व त्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जिथे एकदा चूक केल्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही काम विचारपूर्वक करावे.

विशेषत: निष्काळजीपणा, वाईट संगत आणि आळस यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर चाणक्यजींच्या या गोष्टी तुमच्या जीवनात अवश्य अवलंबा.

चाणक्य नीतिनुसार कोणतेही काम (Work) करण्यासाठी एक वेळ निश्चित करा. विद्यार्थ्यांसाठी शिस्त खूप महत्त्वाची आहे. याचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही. असे विद्यार्थी सहज आपले ध्येय साध्य करतात.

आजचे काम कधीही उद्यापर्यंत पुढे ढकलू नये

चाणक्य नीती म्हणते की विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे. जे विद्यार्थी आयुष्यात आळस अंगीकारतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. त्यामुळे आळसापासून दूर राहिले पाहिजे तरच ध्येय गाठता येईल. तसेच आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नये. असे करणारे नेहमी ध्येयापासून दूर राहतात.

वाईट संगत टाळा

चाणक्य नीतीनुसार विद्यार्थ्यांनी नेहमी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. नेहमी चांगले आणि खरे मित्र बनवले पाहिजेत. यशात (Success) मित्रांची संगतही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे वाईट संगतीपासून दूर राहा अन्यथा तुम्हाला नेहमीच नुकसान सहन करावे लागेल. हा यशाचा सर्वात मोठा अडथळा ठरतो. यामुळे कधी-कधी अपमान आणि त्रासाला सामोरे जावे लागते.

रागावर नियंत्रण

चाणक्य नीतीनुसार जो विद्यार्थी ज्ञान असूनही रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो अज्ञानी व्यक्तीसारखा असतो. कारण जेव्हा तो रागावतो तेव्हा त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते, म्हणून विद्यार्थ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT