Chanakya Niti On Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Problem : आयुष्यात शांत चित्ताने विचार केल्याने मार्ग होतील मोकळे, छोट्यापासून मोठ्या समस्यांवर करता येईल मात; जाणून घ्या

Life Problem : आचार्य चाणक्यांची धोरणे खुप कठीण आहेत, पण हे कठोरपण जीवनाचे सत्य दर्शवतात.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्यांची धोरणे खुप कठीण आहेत, पण हे कठोरपण जीवनाचे सत्य दर्शवतात. आपल्या व्यस्त जीवनात आपण या कठोर धोरणांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हे शब्द आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मदत करतात. आज आपण आचार्य चाणक्यांच्या धोरणांपैकी एका विचाराचे विश्लेषण करूयात.

'रागाच्या भरात समस्या सुटू शकत नाहीत, पण शांत मन असल्यावर प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकते.' आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की व्यक्ती शांत मनाने कोणतीही समस्या सोडवू शकते. मग ती समस्या कितीही मोठी असली तरी ती समस्या सोडवता येते. पण रागाच्या भरात तो छोट्या छोट्या समस्याही सोडवू शकत नाही. कारण रागाच्या भरात त्याचा मेंदू आधी काम करणे थांबवतो.

वास्तविक जीवनात असे अनेक प्रसंग येतात जिथे एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येत (Problem) अडकते. अशावेळी या समस्येतून बाहेर पडणे अशक्य असल्याचे दिसते. पण जर एखाद्या व्यक्तीने शांत राहून त्या समस्येच्या उपायांचा विचार केला तर तो त्यावर मात करू शकतो. म्हणजे शांत मनाने त्याला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडवू शकतो.

याउलट, जर तुम्ही रागवत असाल आणि एखाद्या समस्येवर उपाय शोधत असाल तर सर्व प्रयत्न करूनही तुमचे हात रिकामेच राहतील. याचे कारण असे की रागाच्या भरात एखादी व्यक्ती सर्वप्रथम आपल्या मनाचा वापर करणे थांबवते.

त्यावेळी इतका राग (Anger) येतो की काही वेळा त्याला स्पष्ट गोष्टीही अस्पष्ट होतात. म्हणजे त्याच्यासमोर उपाय असला तरी तो दुर्लक्ष करतो. यासाठी आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, रागाच्या भरात समस्या सुटू शकत नाहीत, परंतु शांत मनाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT