Liver cirrhosis saam tv
लाईफस्टाईल

Liver cirrhosis: लिव्हर सिऱ्होसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो का? पाहा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

Liver cirrhosis: यकृताचे जेव्हा गंभीर नुकसान होते आणि कालांतराने त्याची वारंवारता वाढते तेव्हा ते नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता गमावू शकते. याविषयावर डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलीये.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर सिऱ्होसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृताच्या निरोगी ऊती मृत पावतात. त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाहाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात तसेच आपले यकृत त्याचे कार्य सुरळीतपणे पार पाडू शकत नाही. अशा स्थितीत शरीराच्या गरजेनुसार प्रथिनं तयार होत नाहीत. यकृताला रक्त शुध्द करणे, अन्नाचे पचन आणि ऊर्जेची पातळी साठवणे यासारखी महत्त्वाची कार्ये करणे आव्हानात्मक ठरते.

यकृताचे नुकसान हे अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे, क्रॉनिक हिपॅटायटीस बी किंवा सी, फॅटी लिव्हर किंवा इतर यकृत संसर्गामुळे होऊ शकते. कालांतराने, तुमच्या यकृतास आवश्यक पोषक तत्वे, हार्मोन्स आणि शरीरातील टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी संघर्ष करावा लागतो जे तुमच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम करते.

नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील यकृत तज्ज्ञ आणि एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या टप्प्यात, लिव्हर सिऱ्होसिसची लक्षणे चटकन दिसून येत नाहीत. पण हा आजार जसजसा वाढत जातो तसतसा थकवा येणे, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ), जखम होणे, पाय किंवा पोटास सूज येणे, गोंधळ उडणे किंवा वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. सिऱ्होसिस बहुतेकदा प्रगत टप्प्यात आढळून येईपर्यंत तो लक्षात येत नाही कारण त्याची लक्षणे हळूहळू विकसित होतात. सिऱ्होसिस हा एक मंद गतीने वाढणारा आजार आहे. त्याच्या वेळीच निदानाने भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.

निरोगी यकृतासाठी करा योग्य आहाराची निवड

सिऱ्होसिस पुन्हा होऊ शकतो की नाही हे तो कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून असते. जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असाल तर मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणे जसे की अल्कोहोलचे सेवन टाळणे, हिपॅटायटीसवर उपचार करणे किंवा फॅटी लिव्हर असल्यास वजन नियंत्रित करणे योग्य राहील.

एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की हे नुकसान पूर्णपणे कमी करता येत नसले तरी जखम अथवा व्रण टाळता येऊ शकतात किंवा त्याची गती कमी केली जाऊ शकते. प्रगत टप्प्यात ते सहसा बरे होत नाही. कारण निरोगी पेशींवर चट्टे पडल्यानंतर त्यांना सामान्य ऊतींमध्ये बदलता येत नाही. या टप्प्यावर उपचार हे पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यावर, लक्षणे व्यवस्थापित करण्यावर आणि यकृत निकामी होणे किंवा अगदी कर्करोगासारख्या पुढील गुंतागुंत रोखण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात.

गंभीर प्रकरणांमध्ये, यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते. म्हणूनच ही स्थिती वेळीच ओळखणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी करून वेळीच निदान करणे शक्य आहे. यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यामध्ये मद्यपानाचे सेवन टाळणे, पुरेसे पाणी पिणे, वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे याचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT