Vrishabh Rashi Personality Saam TV
राशिभविष्य

Vrishabh Rashi Personality : वृषभ राशीचे लोक सर्वांनाच हवेहवेसे का वाटतात? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Taurus Personality : वृषभ म्हणजे बैल. बैलासारखे कष्टही करतील आणि तरीसुद्धा स्वतःला छान मेंटेन करतील. आणि म्हणून वृषभेचे लोक सर्वांना हवेहवेसे वाटतात.

Anjali Potdar

राशी स्वामी शुक्र. स्थिर व अर्थ तत्वाची रास. धनस्थानाशी निगडित असणारी रास. मुळामध्येच पैसे मिळवणे आणि खर्च करणे या दोन गोष्टी आपल्याला लीलया जमतात. वृषभ म्हणजे बैल. बैलासारखे कष्टही करतील आणि तरीसुद्धा स्वतःला छान मेंटेन करतील. आणि म्हणून वृषभेचे लोक सर्वांना हवेहवेसे वाटतात.

मनाचा कारक चंद्र या राशीत सुखावतो. एकनिष्ठ, प्रेमळ, विनोदी सचोटीने काम करतात, काही वेळेला कामांमध्ये धीमे पण असतो पण पद्धतशीर आणि व्यवस्थित काम करू शकतात.

सातत्याने कामात राहणे यांचे गुण. नियम पाळणे आवडते. एकूणच कलाकुसर प्रिय, पैसे खर्च करणे, छान राहणीमान, गोड बोलणे या गोष्टींमुळे स्वतः आनंदात राहून इतरांना आनंद देणारी ही रास.

काही वेळेला हट्टीपणा विचित्र हौस, त्याचबरोबर आळस, मठ्ठपणा या गोष्टी आपल्याकडे येतात. म्हणूनच विशेषत्वाने देवी उपासना आपण करावी. त्याचा नक्की फायदा होईल. आपल्या राशीचा अंमल कंठावर आहे.

त्यामुळे घशाशी निगडित आजार, डोळ्याचे आजार, त्याचबरोबर विचित्र खाण्यापिण्याचे सवयी यामुळे होणारे त्रास, अति आधुनिक राहणीमान किंवा खूप खाण्याच्या सवयी यामुळे पोटाचे आजार आपल्याला होऊ शकतात. खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवल्यास तब्येत चांगली राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

Hingoli : तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडलेले सोयाबीन; हिंगोली, सेनगाव तालुके वगळल्याने शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT