वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसर्या राशीमध्ये भ्रमण करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. येत्या काळात अशाच एका राजयोगाची निर्मिती होणार आहे.
यावर्षी ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. दरम्यान याच दिवशी गुरु आणि चंद्रमा यांची युती होणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.
या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग शुभ सिद्ध होणार आहे. तुम्ही या काळात करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. व्यापारी व्यक्ती त्यांचा व्यापार विस्तारीत करू शकतील. विवाहित लोकांच्या आयुष्यातील समस्या दूर होणार आहेत. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल.
या राशीच्या व्यक्तींचे गजकेसरी राजयोगामुळे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या राजयोगामुळे तुमचा भाग्योदय होणार आहे. अडकलेली सर्व काम पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. करियरमध्ये नवी उन्नती होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.
या राशींच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग लाभदायक ठरणार आहे. हा योग तुमच्या कर्मभावात तयार होणार आहे. व्यापार आणि कामात तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकणार आहेत. योजनांचा लाभ मिळू शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.