एक्स्क्लुझिव्ह

VIDEO | दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळलं, पोलिस आणि आंदोलक आमने-सामने, वाचा काय घडलं?

साम टीव्ही

दिल्लीत विविध ठिकाणाहून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात आंदोलक शेतकरी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. संजय गांधीनगर, टिकरी बॉर्डर, ट्रान्सपोर्ट नगर तसंच कर्नाल बायपासवर पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. त्यानंतर या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे गेले काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन आज चिघळल्याचं पहायला मिळालं.

संजय राऊतांचा सरकारला सवाल

शेतकरी आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतात का? असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटवरून विचारलाय.

नाना पटोलेंचा आंदोलनाला पाठिंबा 

मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्चाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जर गरज पडली तर पदाची खुर्ची खाली करून शेतकऱ्यांसोबत उतरेन अशी भावना नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यपालांवरही टीका केली असून राज्यपालांबद्दल मी काही बोलू शकत नाही ,पण ते कोणाच्या इशार्यावर चालतायत ते सगळ्या जगाला माहिती आहे. असंही पटोले म्हणालेत.


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

SCROLL FOR NEXT