Bigg Boss  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss च्या घरात सूत जुळले, बाहेर फिस्कटले; १० कपल्सची ब्रेकअप स्टोरी

Shreya Maskar

हिंदी असो वा मराठी सध्या सर्वत्र बिग बॉसची (Bigg Boss) चर्चा सुरू असते. अनेक लोक आवडीने बिग बॉस शो पाहतात. प्रत्येक दिवशी बिग बॉसच्या घरात नवीन काय घडते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून असते. हिंदी बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग सर्वात जास्त आहे. हिंदी बिग बॉसमध्ये अनेक टीव्ही स्टार, सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर तसेच काही वेळा अनेक मोठ्या कलाकारांचा यात समावेश असतो. काही लोक या घरात पहिल्यांदा भेटतात तर काहींची जुनी ओळख असते. बिग बॉसच्या घरातील हा काळ कोणत्याही व्यक्तीला ओळखण्यास पुरेसा पडतो. कारण यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यासोबत तुमची खेळाडू वृत्ती देखील दिसते. एकत्र काम करताना तसेच खेळताना स्पर्धकांमध्ये मैत्री होते. तर काही वेळा हे नाते मैत्रीच्या पलीकडे जाऊन प्रेमात रूपांतर होते.

आपण अनेक वेळा बिग बॉसमध्ये पाहिले असेल की, अनेक प्रेमाची नाती येथे खुलली आणि त्यांनी तो सीजन देखील गाजवला. मात्र बिग बॉस शो नंतर काहींची नाती टिकली तर काहींची नाती तुटली. यात बिग बॉस घरातील प्रेमाची नाती तुटण्याची संख्या जास्त आहे. आज आपण अशाच बिग बॉसच्या जोडप्यांविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्या ब्रेकअपची कारणे पाहणार आहोत.

प्रसिद्ध १० बिग बॉस कपल ज्यांचा ब्रेकअप झाला

सारा खान-अली मर्चेंट

सारा खान आणि अली मर्चेंट बिग बॉस 4 एकत्र खेळताना दिसले. या दोघांनी बिग बॉस संपल्यावर लग्न देखील केले. पण अवघ्या दोन- तीन महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. लग्नानंतर त्यांच्यामध्ये मतभेद होऊन रोज भांडणे होऊ लागली यामुळे त्यांचे नाते तुटले.

गौहर खान-कुशाल टंडन

बिग बॉस 7 मध्ये गौहर खान आणि कुशाल टंडन एकत्र दिसले. त्यांनी खूप छान गेम देखील खेळला. यांचे नाते बिग बॉसच्या घरानंतर जास्त काळ टिकले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, गौहरने कुशालला आपला धर्म बदलण्यास सांगतले होते. जे कुशाल टंडनला पटले नाही आणि त्यांच्यात ब्रेकअप (Breakup ) झाला. मात्र बिग बॉसच्या घरात ती दोघ एकमेकांच्या खूप जवळ होती. या दोघांचे नाते देखील वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे तुटले.

तनीषा मुखर्जी- अरमान कोहली

तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली बिग बॉस 7 च्या घरात एकत्र पाहायला मिळाले. या सीझनमध्ये या दोघांच्या रेलिशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉस घराबाहेर पडताच या दोघांनी ब्रेकअप केला. तनीषाने एका दिलेल्या मुलाखतीत अरमान कोहलीचा राग ब्रेकअपचे कारण सांगण्यात आले आहे.

करिश्मा तन्ना- उपेन पटेल

करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल हे बिग बॉस 8 च्या सीजनचे सर्वात भारी आणि गाजलेली जोडी आहे. या दोघांनी बिग बॉस घरातून बाहेर पडल्यावर दोन वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर एकमेकांच्या वैयक्तिक मतभेदानंतर ही दोघ विभक्त झाले. मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माला उपेनसोबत आपले सुरक्षित भविष्य दिसत नव्हते. ज्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला.

पुनीश शर्मा- बंदगी कालरा

पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा बिग बॉस 11 एकत्र दिसले होते. बिग बॉसच्या घरात यांची ओळख होऊन त्यांच्या प्रेम झाले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तब्बल चार-पाच वर्ष ती दोघ एकत्र होते. मात्र त्यानंतर ही जोडी वेगळे झाले. अनेक लोकांना हे कपल खूप आवडायचे. त्याचा ब्रेकअप हा एकमेकांना नीट समजून घेऊन करण्यात आला. दोघांनीही आपल्या करिअरसाठी एकमेकांना सोडले, असे मीडिया रिपोर्टनुसार सांगितले जाते.

माहिरा शर्मा - पारस छाबड़ा

बिग बॉस 13 मधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे माहिरा शर्मा आणि पारस छाबड़ा. यांनी बिग बॉसच्या घरात खूप छान वेळ घालवला आहे. बिग बॉसनंतरही या दोघांचे छान नाते सुरू होते. दोघही लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते. मात्र कालांतराने काही मतभेदांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला.

हिमांशी खुराना - आसिम रियाज

हिमांशी खुराना आणि आसिम रियाज बिग बॉस 13 मध्ये एकत्र दिसले होते. बिग बॉस घरात असताना त्यांचे प्रेम जुळले. बिग बॉस संपल्यानंतर काही काळातच लव्ह बर्ड हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांचा ब्रेकअप झाला. यासंबंधी पोस्ट हिमांशीने आपल्या सोशल मिडियावर केली होती. तिच्या सोशल मिडिया पोस्टनुसार, या दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे हे दोघ विभक्त झाले. त्यांनी आपले चार वर्षाचे नाते मोडले.

ईशान सहगल- मायशा अय्यर

ईशान सहगल आणि मायशा अय्यर बिग बॉस 15 च्या घरात एकत्र भेटले. बिग बॉस घरात हे दोघे एकत्र रोमान्स करताना दिसले. बिग बॉस घराबाहेर येताच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांमध्ये काही सुरळीत चालू नसल्यामुळे पुढे एकत्र न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

शमिता शेट्टी- राकेश बापट

शमिता शेट्टी- राकेश बापट बिग बॉस ओटीटी सीजन 1 मध्ये एकत्र पाहायला मिळाले. बिग बॉस घरातच त्यांची पहिली भेट झाली. तिथे दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र बिग बॉस घरातून बाहेर पडताच अवघ्या काही महिन्यात दोघांनी ब्रेकअप केला. त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघेही आता छान मैत्र आहेत.

एजाज खान- पवित्रा पुनिया

एजाज खान आणि पवित्रा पुनिया बिग बॉस 14 मध्ये एकत्र पाहिले गेले. बिग बॉसच्या घरात त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. बिग बॉसनंतर अनेक काळ ती दोघे एकत्र होती. त्यांनी एकत्र साखरपुडा देखील केला होता. पण लग्नाआधीच त्यांचा ब्रेकअप झाला. त्यांचे बराच वेळ एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे त्यांना हे नाते पुढे टिकवणे कठीण जात होते. यामुळे त्यांनी दोघांच्या संमतीने ब्रेकअप केला.

आता यातील अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. तसेच काही तर पालक देखील झाले आहेत. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त असताना दिसत आहे. तसेच करिअरमध्ये प्रगती होताना पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT