Kangana Ranaut and Javed Akhtar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut and Javed Akhtar: कंगना राणौत-जावेद अख्तर वाद ५ वर्षांनंतर संपला; अभिनेत्रीने सांगितले कसे झाले समेट

Kangana Ranaut and Javed Akhtar: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतचा तिचा दीर्घकाळचा कायदेशीर वाद संपवला आहे.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut and Javed Akhtar: बॉलिवूडची 'पंगा क्वीन' आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौतने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतचा त्यांचा दीर्घकाळची कायदेशीर लढाई संपवली आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) कंगनाने इंस्टाग्रामवर जावेद अख्तरसोबतचा एक फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने असेही सांगितले की हे प्रकरण मिटले आहे आणि अख्तर यांनी तिच्या पुढच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास सहमती दर्शवली आहे.

या फोटोसोबत कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, 'जावेद जी आणि मी आमचा कायदेशीर प्रश्न (मानहानी खटला) मध्यस्थीद्वारे सोडवला आहे.' तिने पुढे लिहिले आहे की, त्यांनी माझ्या पुढील दिग्दर्शनासाठी गाणी लिहिण्यासही सहमती दर्शवली आहे.'

न्यायालयाने कंगनाला 'शेवटची संधी' दिली होती.

काल (२८ फेब्रुवारी) ही अभिनेत्री मुंबईतील एका न्यायालयाबाहेर दिसली. यावेळी कंगना साध्या गुलाबी साडीत दिसली. काही दिवसांपूर्वी, मुंबईतील एका न्यायालयाने कंगनाला तिच्या आणि अख्तर यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या मानहानीच्या खटल्याचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थी बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यापूर्वी 'शेवटची संधी' दिली होती. दरम्यान, कंगनाने न्यायालयाला ती संसदेत उपस्थित असल्याचे कळवले होते, त्यामुळे तिला न्यायालयात हजर राहता आले नाही.

कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील कायदेशीर लढाई

कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील कायदेशीर वाद मार्च २०१६ मध्ये जावेद अख्तर यांच्या घरी झालेल्या भेटीपासून सुरू झाला. त्यावेळी, कंगना आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन एका वादामुळे चर्चेत होते, या वादात ई-मेलची देवाणघेवाण झाली आणि त्याचे रूपांतर सार्वजनिक भांडणात झाले. अख्तर, हे रोशन कुटुंबाच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांनी एक बैठक आयोजित केली आणि कंगनाला हृतिकची माफी मागण्यास सांगितले.

हा खटला दाखल करण्यात आला होता.

अभिनेत्रीने एका टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान २०१६ च्या भेटीचा उल्लेख केला. अख्तर यांना कंगनाचे विधान बदनामीकारक वाटले आणि तिच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला. कंगनाने तक्रार दाखल केल्यानंतर कायदेशीर लढाई आणखी वाढली, ज्यामध्ये तिने अख्तर यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. तथापि, दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तरविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, दोन्ही पक्षांनी मध्यस्थीसाठी सहमती दर्शविली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT