Salman khan  saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: भारत-पाक युद्धबंदीवर 'हे' काय बोलला सलमान खान; अभिनेत्याच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर गोंधळ!

Salman Khan: भारत-पाक युद्धबंदीवरील सलमान खानच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे.यापूर्वीही त्याने 26/11 मुंबई हल्ल्यांवर केलेल्या विधानामुळे तो वादात सापडला होता.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षावर शांततेची भूमिका मांडणाऱ्या त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली. ही पोस्ट त्याला नंतर हटवण्यात आली, परंतु त्याच्या विधानांनी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

सलमान खानने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान युद्धाच्या विरोधात एक मत व्यक्त केले. त्याने म्हटले की, "युद्धात दोन्ही बाजूंच्या सैनिकांचे प्राण जातात. ज्यांनी युद्धाचे आदेश दिले आहेत, त्यांना बंदूक देऊन रणांगणात पाठवले पाहिजे. एक दिवसातच त्यांचे हात-पाय थरथरतील आणि ते संवादाचा मार्ग स्वीकारतील."

या विधानांनंतर ट्विटरवर सलमान खानवर टीकेची झोड उठली. काहींनी त्याच्या मताशी सहमती दर्शवली, तर अनेकांनी त्याला पाकिस्तान समर्थक ठरवले. काहींनी आरोप केला की, सलमानने हे विधान केवळ आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी केले आहे. त्याच्या पूर्वीच्या वादग्रस्त प्रकरणांची आठवण करून देत, काहींनी त्याला 'देशद्रोही' असेही संबोधले.

सलमान खानच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांनी त्याच्या विधानांचा निषेध केला आणि त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. काही नेत्यांनी त्याला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला.

ही पहिली वेळ नाही की सलमान खानच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. यापूर्वीही त्याने 26/11 मुंबई हल्ल्यांवर केलेल्या विधानामुळे तो वादात सापडला होता. त्यावेळीही त्याने आपले विधान मागे घेतले होते. सलमान खानच्या या प्रकारांमुळे त्याच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT