Ramayana Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Serial: 'रामायण'चं शुटिंग कुठं झालं?, किती होतं मालिकेचं बजेट?; तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही आहेत उत्तर...

Priya More

Ramayan Serial Budget:

दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची पौराणिक मालिका 'रामायण'(Ramayan Serial) आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. त्याकाळामध्ये या मालिकेला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेला ३६ वर्षे पूर्ण झाली पण आजही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोरोना काळामध्ये या मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील या मालिकेचा टीआरपी जबरदस्त होता.

या मालिकेतील प्रत्येक पात्र सर्वांच्या लक्षात आहे. पण त्या काळामध्ये ही मालिका कशी तयार करण्यात आली, त्याचं शुटिंग कुठं करण्यात आलं होतं?, मालिकेचे बजेट किती होतं? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. त्यांच्या याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

इतकं होतं मालिकेचं बजेट -

रामायण या मालिकेचा पहिला भाग २५ जानेवारी १९८७ साली दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आला होता. त्याकाळी या मालिकेच्या एका एपिसोडचे बजेट तब्बल ९ लाख रुपये होते. म्हणजेच ७८ एपिसोडच्या या मालिकेचे संपूर्ण बजेच हे ७ कोटींच्या आसपास होते. म्हणजेच ७ कोटी रुपये खर्च करून प्रेक्षकांसाठी ही मालिका तयार करण्यात आली होती.

मालिकेने केली इतक्या कोटींची कमाई -

महत्वाचे सांगायचे झाले तर, या मालिकेने एका एपिसोडमधून त्याकाळामध्ये ४० लाख रुपयांची कमाई केली होती. म्हणजे अंदाजे या संपूर्ण मालिकेला ३१ कोटी ४ लाखांचा नफा झाला होता. ही त्याकाळातली मालिकेच्या माध्यमातून केलेली विक्रमी कमाई होती. या मालिकेचे शुटींग कुठे झआले होते हे जाणून घेण्यामध्ये अनेकांना खूपच रस आहे. या मालिकेचा सेट गुजरातमधील जनगणना असलेल्या उंबरगावमध्ये तयार करण्यात आला होता. तर मालिकेतील काही सीन वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आले होते.

५५० दिवस चालले मालिकेचे शुटिंग -

रामायणाच्या पहिल्या एपिसोडचे शूटिंग जवळपास १५ दिवस चालले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी या मालिकेचे सर्व क्रू मेंबर्स हे शूटिंगच्या लोकेशनवरच राहतो होते. या संपूर्ण मालिकेचे शूटिंग ५५० दिवस चालले होते. ही पहिली अशी मालिका होती की ज्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स वापरण्यात आले होते. पुष्पक विमान असो वा हनुमानाच्या उडण्याचा देखावा असो या सर्वांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. प्रेक्षकांनाही हे सीन्स खूप आवडले.

रामसेतूचा सीन खरा? -

या मालिकेचे बहुतांश शुटिंग हे सेटवर झाले असले तरी देखील राम सेतू सीनचे शुटिंग हे खऱ्या लोकेशवर झाले आहे. रामानंद सागर यांनी चेन्नईमध्ये हा सीन शूट केला होता. दरम्यान, या मालिकेसंदर्भातील अनेक मनोरंजक किस्से आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मालिकेमध्ये काम केलेल्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. सध्या ही मालिका तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT