Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Controversy: 'आदिपुरुष'वरून वाद पेटला! चित्रपटाच्या लेखकाला वाटते भीती, मुंबई पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Priya More

Adipurush Movie: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या (South Superstar Prabhas) नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटावरुन (Adipurush Movie) वाद सुरु आहे. एकीकडे या चित्रपटाला विरोध होत आहे तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

आदिपुरुष चित्रपटाची कथा आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या संवादांबाबत देशभरात निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. हा गोंधळ पाहता या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सुरक्षेची मागणी केली आहे.

आदिपुरुष चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. याप्रकरणी मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी निर्णय घेत मनोज यांना सुरक्षा पुरवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' चित्रपट 16 जून रोजी म्हणजेच शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संवादांवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या चित्रपटावर टीका देखील केली जात आहे. यासोबतच चित्रपट निर्मात्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संवाद याच्यावर टीका केली जात आहे. या चित्रपटातील संवादांमुळे संतप्त झालेल्या अयोध्येतील संतांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संतांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या विकृतीवर देखील संतांनी आक्षेप घेतला होता.चित्रपटात रामायणातील पात्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून हिंदू देवतांना विकृतपद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा या साधू संतांनी केला आहे.

दरम्यान, या चित्रपटातील तीन संवादांमुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात भगवान हनुमान जेव्हा सीता मातेला भेटायला लंकेला जातात. तेव्हा एक राक्षस त्यांना पाहतो आणि म्हणतो, 'ये लंका क्या तेरी बुवा का बगीचा है, जो हवा खाने चला आया.' दुसरा संवाद म्हणजे, एका दृश्यात हनुमानजी लंकेत येतात. तेव्हा त्यांच्या शेपटीला आग लावल्यानंतर मेघनाथ त्यांना विचारतो. ज्याला उत्तर देताना हनुमान म्हणतात की, "तेल तेरे बाप का..कपड़ा तेरे बाप का..और जलेगी भी तेरे बाप की."

तर तिसरा संवाद म्हणजे, भगवान हनुमान तिथून परतल्यावर भगवान रामाला त्यांच्याकडून त्या ठिकाणाची स्थिती कळते. ज्याच्या प्रत्युत्तरात हनुमान म्हणतात की,'उन्हें बोल दिया है कि जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT