Mahesh Tilekar And Balya Singer Facebook/ @Mahesh Tilekar
मनोरंजन बातम्या

Balya singer : 'आमदाराचे पाय जर बाल्या राहतो, त्या आदिवासी वस्तीकडे वळले तरच...'; टिळेकरांची पोस्ट चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Balya Singer: 'आग पोरी तू स्वप्नात येना' या गाण्यामुळे अल्पवधीतच सोशल मीडियावर फेमस झालेला बाळ्या गायक उर्फ बाळा रतन दिवे या आदिवासी गायकाचा मासेमारी करताना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता. तो जरी आदिवासी गायक असला तरी, त्याच्या गाण्याची चर्चा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत चर्चिली होती.

त्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी ही हळहळली आहे. बाळ्याने आापल्या आवाजाची ओळख स्वतः निर्माण केली होती. त्याच्या भेटीला काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश टिळेकर गेले होते. त्यावेळचा एक फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावरुन सिंगर बाळ्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये महेश टिळेकर म्हणतात, "बाल्या चटका लावून गेला. आपल्या दमदार आवाजात पारंपरिक आदिवासी गाणी, लोकगीतं गाऊन लोकांचे मनोरंजन करणारा आदिवासी गायक बाल्याची मागे एकदा मी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती . शालेय आणि संगीतातील कोणतंही शिक्षण न घेतलेला बाल्या परमेश्वराने दिलेल्या आवाजात ठेका धरून गाणी गाऊ लागला की ऐकणारा स्तब्ध होऊन जाई.

शहापूर मधील आदिवासी पाड्यातील त्याच्या झोपडीत जाऊन मी त्याची भेट घेतली तेंव्हा साडीच्या झोळीत झोपलेली त्याची तीन महिन्यांची मुलगी दिसली. चुलीवर भात शिजवणारी त्याची बायको आणि तिला बिलगलेला दुसरा एक मुलगा. गरिबाच्या घरात अंधार असताना कुडाच्या भिंतीमधून सूर्यप्रकाशाची एक तिरीप आत येत होती. तोच काय उजेड. मासेमारी करून दारोदार जाऊन ते विकून त्यावर पोट भरणारा बाल्या पावसात खूप हाल होतात ते कळवळून मला सांगत होता.

सरकारने त्यांच्यासाठी पक्की घरे बांधून द्यावी अशी तिथल्या सर्व आदिवासींची मागणी असल्याचं त्याने मला सांगितलं होतं. काल मासे पकडायला गेलेल्या बाल्यावर काळाने घाला घातला. साप चावल्याने बाल्याचा जागीच मृत्यू झाला. बाल्या गेल्याचं दुःख तर आहेच पण त्याची बायको पदरी असलेल्या दोन लहान मुलांसह पुढचं सगळं आयुष्य कसं काढणार ?, ना कुणाचा आधार न कसली सरकारी मदत.

आदिवासी कलेचा प्रसार आपल्या पारंपारिक गाण्यातून करणारा बाल्या गेला म्हणून सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं टिपिकल वाक्य बोलून श्रद्धांजली वाहण्यासाठी कुणा नेत्याचे ,स्थानिक आमदाराचे पाय जर बाल्या राहतो त्या आदिवासी वस्ती कडे वळले तरच त्यांना कळेल. वीज, पाणी, रस्ते कुठल्याही सुविधा नसतानाही गरिबीत दिवस काढून लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचे आयुष्य किती खडतर आहे. बाल्या भावपूर्ण श्रद्धांजली"

तिथल्या स्थानिक आमदारांनी अथवा नेत्यांनी त्या परिसरातील आणखी एका गोर-गरिब बाल्याचा जिव जाण्याआधी स्थानिक नागरिकांना काय समस्या आहेत. हे जाऊन विचारणे महत्वाचे आहे. वीज, पाणी, रस्ते कुठल्याही सुविधा नसतानाही गरिबीत दिवस काढून लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचे आयुष्य किती खडतर आहे. हे तिथे गेल्यावर त्यांना नक्की उमगेल. अशी आशा आहे.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : सूरज चव्हाणने घेतली अजितदादांची भेट; पाहा नेमकी काय झाली चर्चा

Dussehra Melava 2024 Live Updates: कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने

IND W vs AUS W: टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत! AUS विरुद्धचा सामना गमावल्यास कसं असेल सेमीफायनलचं समीकरण?

Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व; राज ठाकरेंची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? वाचा

Reliance Jioचा दिवाळी धमाका; 7 स्वस्त रिचार्ज प्लान लॉन्च

SCROLL FOR NEXT