

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमी विद्यार्थ्यांची आमदारांनी केली विचारपूस...
जखमी विद्यार्थ्यांना सर्व स्तरावरून मदत करणार असल्याचं आमदार आमश्या पाडवी यांनी दिल आश्वासन...
स्कूल बस खाईत कोसळून या अपघातात दोन विद्यार्थ्यांना गमवावा लागला जीव...
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग . पालघरच्या दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्याजवळ धावत्या कारला भीषण आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली . शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. कारमधील चारही प्रवासी सुखरूप . आगीत कार जळून खाक
पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पतित पावन संघटना आणि शिवसनेची युती
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार युती
पुण्यात भव्य कार्यकर्ता मेळावा
मंत्री विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ...
बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर सुरक्षेत वाढ...
विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख बक्षीस देण्याचे कडू यांचे वक्तव्य...
कडू यांच्या वक्तव्यानंतर विखे पाटलांची सुरक्षा वाढवली...
नंदूरबारमधील स्कूल बस अपघातात मृत्यूचा आकडा वाढला
भीषण अपघातात 2 विद्यार्थ्याच्या मृत्यू
अपघात एक 13 वर्षीय विद्यार्थिनी आणि 14 वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
बस मधील एकूण 56 विद्यार्थी असून त्यापैकी 6 गंभीर जखमी.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांद्वारे त्यांची बदनामी आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करत असल्याचा आरोप ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना समर्थन दर्शविले.
शेतकऱ्यांच्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.. विखे पाटलांनी कारखान्यासाठी कर्ज काढायचं ते बुडवायचं आणि पुन्हा कर्जासाठी वेगवेगळ्या पक्षात लोटांगण घ्यायचं.. असच त्यांनी केलय त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलू नये आणि तमाम शेतकऱ्यांची त्यांनी माफी मागावी असंही तुपकर यांनी म्हटलं आहे...
पुण्यातील ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटी येथे इमारतीच्या सहाव्या मजल्यावर घरामध्ये गॅस लीक होऊन आग लागली होती. ही घटना दुपारी १ वाजता घडली. अग्निशमन दलाने आगीवार पाणी मारून आग विझवली. या घटनेत ९९ वर्षाचे बाबुराव दत्तात्रय महामुनी यांना भाजलेल्या अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आले व नातेवाईक यांच्या मदतीने दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले. आगी मध्ये घराच्या स्वयंपाक घरातील साहित्य इलेक्ट्रिक वायरिंग भिंतीचा कलर इत्यादींचे आगीमध्ये जळून नुकसान झाले.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉज ला आग लागल्याची घटना घडली असून अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने फर्निचर दुकानासह लॉज जळून खाक झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच फैजपूर सह सावदा भुसावळ येथून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर लॉज मधील एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या जात आहे.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील अस्तगाव येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय.. आपला DNA शेतकऱ्याचा असून मी आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतलेली नाही.. मी भाषणात जे बोललो ते पूर्ण दाखवले नाही फक्त ठरावीक मुद्दा दाखवला.. काहीजण निवडणूक लढण्यासाठी सोसायटीचे कर्ज काढतात आणि कर्ज थकले की कर्जमाफीची मागणी करतात असे मी म्हणालो होतो.. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत मी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टिका केली जात आहे.. त्यामुळे भाषण करायची पंचाईत झाली असून मी आता भाषण न करण्याचे ठरवलंय असं विखे पाटील म्हणालेत..
फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर हे आज बीडच्या वडवणीतील कवडगाव बुद्रुक येथे कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले. सोबत ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे
वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांकडून घडलेल्या घटने संदर्भात माहिती जाणून घेत आहेत.
विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतर आज मराठा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर डॉक्टर महिला कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे मागच्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेल्यानंतर शेतात काम करणा-या महिलांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घातलेत
उत्तर पुणे जिल्हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय,बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी हि अनोखी शक्कल लढवलीय
सातपुड्यातील देवगोई घाट परिसरात स्कूल बसच्या भीषण अपघात....
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली.....
खोल दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक....
अपघात ग्रस्त स्कूल बस मध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती....
मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना आम्लीबारी घाटात अपघात ....
शंभर ते दीडशे फूट खोल दरीत बस कोसळल्याने बस चक्काचूर.....
जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती....
बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक...
चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत...
जेवढं वय बच्चू कडूंच आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा आहे, तायडेंचा कडूवर निशाणा...
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडू वर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, आमदार प्रवीण तायडे यांची मागणी..
मुंबई गोवा महामार्गावर खड्डयांमुळे अपघात झाला आहे. या अपघातात तीन कार एक मेकावर आदळल्या असून सुदैवाने कोणीही जखमी झालेला नाही. माणगाव आणि इंदापुर दरम्यान कशेणे गावच्या हद्दीत हा अपघात झाला. माणगाव इंदापुर दरम्यान कशेणे गावच्या हद्दीत डायव्हर्जनचे ठिकाणी रस्तावर खड्डे पडले आहेत. या ठिकाणी पहिल्या कारने ब्रेक मारले आणि मागुन येणाऱ्या दोन कार अशा तीन एक मेकाकांवर आदळल्या असल्याची माहिती अपघातग्रस्त गाड्यांमधील प्रवाशांनी सांगितली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या गंभीर आरोपाचे तीव्र पडसाद धुळे शहरात उमटले आहेत, या घटनेच्या निषेधार्थ शहरातील शिवतीर्थ चौक परिसरात सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले, यावेळी संतप्त आंदोलकांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राज्यात महायुती सरकार एकत्र असताना सांगली जिल्ह्यात जतचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजपकडून नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवा्रांची यादी निश्चित केली असून अद्याप महायुती म्हणून कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही प्रस्ताव आल्यावर विचार करू असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.
जतचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शुभांगी बनेनवर व पती अशोक बनणेंवर आणि कुटुंबियांनी आज जतच्या विकासासाठी गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नाशिकच्या मनमाड मधिल संत बार्णबा चर्च मध्ये आज हंगामी बाजार भरवण्यात आला होता.निसर्ग आणि देवाच्या प्रति श्रध्दा व्यक्त करण्यासाठी ख्रिश्चन समाजा तर्फे प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या रविवारी हा हंगामी सण साजरा करीत असतात.यावेळी शेतात पिकलेले शेतमाल,बोकड,कोंबड्या चर्च मध्ये आणून त्या देवाला अपर्ण करतात,तर याठिकाणी अनेक खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले जातात,जमा झालेल्या वस्तूंची लिलावा द्रवारे बोलणी होऊन आलेल्या विक्रीतून जमा झालेले पैसे चर्चच्या माध्य गोरगरिबांना नाताळाच्या पुर्वी मदत स्वरुपात वाटले जाते.
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिवसेना उबठा गटाकडून कडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी उमेदवार निवडीच्या दृष्टीने शिवसेनेचे वरिष्ठ नेते व खासदार अरविंद सावंत यांनी आज अमरावतीत बैठक घेतली.
या बैठकीस जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षशिस्त, संघटन बांधणी आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आता उभाटा शिवसेना गटाने मोर्चेबांधणीला वेग दिला असून, आगामी निवडणुकीत पक्ष मजबुतीने उतरवणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग आला आहे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना अजूनही मुलाखती सुरू असल्याचं वाशिम शहरात बघायला मिळालं. वाशिम नगरपरिषदेसाठी भाजप कडून आज महिला उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.. यावेळी भाजपकडून वाशिम नगरपरिषदेसाठी महिला उमेदवारीसाठी मोठी गर्दी दिसून आली. यावेळी वाशिम नगर परिषदेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून राजू पाटील राजे आणि डॉ. राजीव काळे यांनी निरीक्षक म्हणून मुलाखती घेतल्या.
मुंबई गुन्हे शाखा 12 ने दिवसाढवळ्या घरफोड्या करून चांदीचे दागिने, रोकड, काडतूस आणि इतर मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी दाखल गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई केली.
चारकोप विधानसभा मतदार यादीत एक आश्चर्यकारक आणि गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. बिपीन अरविंद पटेल — ज्यांनी नंतर कायदेशीररीत्या आपले नाव बदलून श्रीयंस व्ही. पटेल केले — या व्यक्तीचे नाव मतदार यादीत एकदा-दोनदा नव्हे तर चक्क चार वेळा आढळून आल्याचा खळबळ जनक दावा मनसेकडून करण्यात आला आहे. चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी हा दावा केला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 775 वैकुंठ गमन उत्सवा निमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वारकरी दिंडीत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून पालखी खांद्यावर घेऊन पायी वारी करत या सोहळ्यात उपस्थित दर्शवली तसेच टाळ वाजून भजनात देखील दंग झालेले पाहायला मिळाले. वारकरी संप्रदायाचे हजारो वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र आता युती होईल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मतदारसंघातील मेढा या गावांमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेळावा घेऊन युतीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत जाहीर सभेत बोलले होते.या टीकेला उत्तर देत असताना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शंभूराजे देसाई यांच्यावर जाहीर भाषणातून जोरदार टोलेबाजी केली आहे.जसा निर्णय आपल्या पाटण विधानसभा मतदार संघात होईल तसाच निर्णय मेढ्यामध्ये होईल. पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय करावा आणि मग आम्हाला सांगावं की महायुती आहे आणि त्याप्रमाणे वागा. कारण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मी आत्ता मंत्री झालो आहे. माझ्या आधीचे मंत्री झाले आहेत.त्यामुळे आम्ही त्यांचं अनुकरणच करत आहोत.मंत्री म्हणून कसं काम करायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकत आहे.वयाने सुद्धा ते मोठे आहेत.त्यांनी त्यांच्या पाटण मतदारसंघांमध्ये महायुती म्हणून घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा त्याचाच अनुकरण आम्ही आमच्या मतदारसंघातील मेढा येथे करू.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपुलाच्या खालचा काही भाग कोसळला . मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील मस्तान नाका येथील महामार्गावरील पुलाच्या खालील भाग कोसळला . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाची दुरावस्था झाल्याचा स्थानिकांचा आरोप. सुदैवाने उड्डाणपुलाखाली वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल तयार केल्यापासून सोळा वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप
लातूर नांदेड जाणाऱ्या महामार्गावर सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रंकरला अचानक गळती लागल्याने, महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली, मागच्या एक तासापासून या टँकर मधील गॅस गळती होत असल्याने परिसरात भीतीच वातावरण आहे, सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन विभागाच्या वतीने गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक जिल्ह्यात अवेळी झालेला पाऊस आणि हवामानातील अनियमिततेमुळे गहू पीक हा विरळ उतरल्याने तसेच खराब झाल्याने नाशिकच्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील योगेश घोरपडे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर वरील उभ्या गहू पिकावर नांगर फिरवून पीक नष्ट केले. उत्पादन खर्च देखील वसूल न झाल्याने शेतकरी हतबल झाला असून आता सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली.
मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टोमणे मारून दिल्या शुभेच्छा
रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिल्या शुभेच्छा
मात्र या शुभेच्छा मध्ये जैन बोर्डिंग मध्ये झालेल्या व्यवहारातील रक्कम २३० कोटी रुपयांचा टोमणा
"हॅपी बर्थडे बरं का...! वाढदिवसाच्या 230 कोटी शुभेच्छा..!" असा या ट्विट मध्ये उल्लेख
होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून युती महायुती बाबत चर्चा सुरु आहेत.. बुलढाण्यात शिंदेसेनेने भाजपाकडे युतीचा प्रस्ताव पाठविला आहे मात्र शिंदेसेना व भाजपामध्ये धुसपूस, आरोप प्रत्यारोप सुरु असल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याने युती होते की नाही याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.. शिंदेसेनेचे आ संजय गायकवाड यांनी भाजपचे निरीक्षक आ आकाश फुंडकर यांच्याकडे युती बाबत लेखी प्रस्ताव पाठविला आहे आम्ही शेवटपर्यंत आशावादी आहोत... जर भाजपाने युती नाकारली तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवायला तयार असल्याच विधान् शिंदेसेनेचे आ संजय गायकवाड यांनी केले आहे...
जिथं नगरपालिका निवडणूक होत आहे, तिथल्या स्थानिक नेत्यांवर कुठल्या पक्षासोबत युती करायची की नाही, करायची हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडलेला आहे. सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी आहे. प्रत्येक वार्ड आणि प्रभाग निहाय भाजपच्या उमेदवारांची चाचपणी सर्वे पूर्ण झालेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील चारही नगरपालिका क्षेत्रात जनतेचा भाजपला मोठ्या प्रमाणात कौल दिसून येत आहे. युती करायची गरज असल्याचं वाटत नाही. मात्र, स्थानिक नेत्यांवर ती जबाबदारी सोपविली आहे. माझं स्थानिक आमदार असो, स्थानिक नेते असो, कार्यकर्ते, मित्रपक्षाशी असो यांच्याशी बोलणं होतं असतं संपर्क आहे. मात्र, युतीबाबत कोणाशीही बोलणं झालेलं नाही, त्यामुळे भाजपची स्वबळावरची तयारी आहे.
पुणे शहरातील मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल घेऊन मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. पुण्यातील बैठकीत मनसेकडून १६५ वॉर्डपैकी अवघ्या ६० ते ६५ वॉर्ड मधील याद्या सादर केल्या होत्या.
बीडच्या माजलगावातील केसापुरीजवळ भीषण अपघात समोरासमोर धडक झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झालंय. देशमुख पेट्रोल पंपाजवळ सादोळ्याकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला समोरून आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली धडकेनंतर स्कॉर्पिओने ऑटो रिक्षा चालकाला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण घटनेत शेख अमीर इलाही या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण या घटनेत गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे… या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कामशेत येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत-खडकाळा गटातून दिपाली दीपक हुलावळे यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी कोथरूड भागात झालेल्या गोळीबारात तो आरोपी होता. त्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वाघ हा निलेश घायवळ टोळीचा सदस्य असल्याची माहिती असून १८ सप्टेंबर रोजी कोथरूड मध्ये एका व्यक्तीवर झालेल्या गोळीबारात त्याचा सहभाग होता. पोलिसांना गुंगारा देऊन तो गायब होता
अमरावती जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रशासराज असल्याने बहुप्रतिक्षित असलेल्या दहा नगरपरिषदासह दोन नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापला आहे, उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, या निवडणुकीत 155 प्रभागातून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडल्या जातील, याममध्ये 141 महिला सदस्य आहेत, सध्या तरी सर्वच राजकीय पक्षातर्फे एकला चलो चा नारा दिला गेला आहे... सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक नगरसेवक आणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या आहे... उद्यापासून मात्र आता अमरावती जिल्ह्यात स्थानिक तहसील कार्यालयात उमेदवारी उचल आणि भरण्यासाठी मोठी लगबग असणार आहे.
वाळूचं अवैध उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरनं मजुरीसाठी जाणाऱ्या सायकलस्वार मजुराला चिरडलं. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मीटेवानी इथं आज सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. अनिल बांगडे (28) असं मृत सायकलस्वाराचं नावं आहे. मृतक अनिल हा साखळी या गावातील असून तो सकाळी आपल्या सायकलने मजुरीसाठी तुमसर शहराकडे निघाला असताना पाठीमागून आलेल्या वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने त्याला चिरडलं. यानंतर सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टरसह चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
धाराशिवच्या दुष्काळी भागात, तीनशे एकर डोंगरातील खडकाळ जमिनीवर तब्बल सव्वा लाख झाडांची लागवड करण्यात आली.यामध्ये जवळपास 50 हजार दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचाही समावेश आहे.बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर यांनी या ठिकाणी इकोव्हिलेज साकारत ध्यानकेंद्र , वाचनालय आयुर्वेदिक रुग्णालय उभा केले.आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना या ध्यान केंद्रातून एक मानसिक आधार दिला जात आहे.गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालखंडात डोंगराळ भागात ही देशी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतलीय
बुलढाणा जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ उडाली आहे तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षात आयकर रिटर्न्स मध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयालाच नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे...
कोठुरे शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य केले असून,वस्तीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दहशत कैद झाली आहे,दरम्यान वनविभावाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी धुळ्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे, आज धुळ्यामध्ये 8.6° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, या वर्षातील हे सर्वात नीचांकी तापमान मानले जात आहे.या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू घसरताना दिसून येत असून, या वाढत्या थंडीचा परिणाम धुळेकरांवर बघावयास मिळत आहे, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी वाऱ्यांमुळे तापमानामध्ये सध्या प्रचंड गारवा वाढला असून, यामुळेच धुळ्याचा तापमानाचा पारा घसरला असल्याचे दिसून येत आहे, यापुढे देखील तापमानामध्ये अशाच प्रकारे घट धुळ्यात बघावयास मिळणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
रायगडकराना आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांपासून हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे तापमान 20 अंशाच्या खाली जात आहे. ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरल्याने संध्याकाळच्या वेळेसही थंड वातावरण असते. दिवसभर जाणवणारे कडक उन्हाचे चटके देखील कमी झाले आहेत. पहाटे पासूनच सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळते.
मावळ भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे मावळ विधानसभेच्या स्तरावर युती झाली पाहिजे युती फक्त एकट्या नगरपालिके करता होणार नाही ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे, मात्र राष्ट्रवादी कडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही....
यवतमाळ नगर परिषदेच्या 29 प्रभागांसाठी भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची गर्दी यावेळी बघायला मिळाली, विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधीलही अनेकांनी उमेदवारी अर्ज केले. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी देखील सात महिलांचे अर्ज आले.पक्ष नेत्यांनी उमेदवारी देताना सर्व्हे करून नावे निश्चित केली असली तरी उमेदवारी लोकशाही मार्गाने ठरवित असल्याचे भाजपने सांगितले.
भाजप,शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी आमदार तानाजी सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार ?
आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
मी एकला चलो रे चा नारा दिला नाही, मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता एकला चलो रे चा नारा दिला, त्यामुळे आम्हीही कुठे गाफील नाहीत, सर्व जागा लढवण्याची आमची तयारी
भाजप, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी , काँग्रेस सर्व एकत्र येत आहेत, त्यातच आजच आमचा विजय
विरोधक एकवटताच आमदार तानाजी सावंताकडून बैठकांचा सपाटा
कर्जत पनवेल आणि उरण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्या दृष्टीने मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात बैठक पार पडली. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत दृष्टीने दोघांमध्ये चर्चा करण्यात आली या वेळेला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना-भाजप समन्वय साधून युती केली जाईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितलं.
अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला. खोपोली जवळ बोरघाटात ही घटना घडली आहे. सौंदर्य प्रसाधने, कटलरी घेऊन हा ट्रक पुण्याकडे निघाला होता. शॉर्टसर्किट मुळे ट्रकमध्ये आग लागली. आणि आतील साहित्याने पेट घेतला. आयआरबीच्या अग्निशमन दलाने आग विझवली आहे. ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक दृष्टीने शिवसेना भाजपची बैठक
कर्जत पनवेल आणि उरण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागलेल्या आहेत त्या दृष्टीने मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात बैठक पार पडली
तसेच पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत दृष्टीने दोघांमध्ये चर्चा करण्यात आली या वेळेला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
शिवसेना-भाजप समन्वय साधून युती केली जाईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितलं
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे
एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने शनिवारी या हवाई मार्गाबाबत शनिवारी घोषणा केली
पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी विमान उड्डाण होणार आहे
पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल
परतीच्या प्रवासात, विमान रात्री ११.४५ वाजता अबू धाबीहून निघेल आणि पहाटे ४.१५ वाजता पुण्यात उतरेल
असे एअर इंडियाने एक्सप्रेस कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे
गुलाबी थंडीला सुरुवात! पुणे शहरात गारठा वाढला
पुणे शहरातील अनेक भागात धुक्याची चादर
पुण्यासह ग्रामीण भागात सुद्धा थंडी सुरू
सकाळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक दिसून येत आहे
गेल्या २,३ दिवसांपासून रात्रीही गारठा वाढू लागला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.