Javed Akhtar : जावेद अख्तर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. 'शोले', 'दीवार' यांसारख्या उत्तम चित्रपटांच्या कथांसोबतच त्यांनी अनेक सदाबहार गाणी लिहिली आहेत. जावेद साहेबांची गाणी लिहिण्याची कथा तुम्ही ऐकली असेलच. पण तुम्हाला माहित आहे का की २००४ मध्ये रिलीज झालेल्या एका चित्रपटादरम्यान त्याने एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला सांगितले होते की त्यांनी एका हत्येची योजना आखली होती.'
जावेद अख्तरने नुकतेच एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना आशुतोष गोवारीकर यांच्या 'स्वदेश' या चित्रपटाविषयी सांगितले. या चित्रपटासाठी 'पल पल है भारी' हे गाणे लिहिण्याची कथा त्यांनी सांगितली आणि हे गाणे लिहिताना आपण किती दडपणाखाली होतो हे सांगितले.
चित्रपट निर्मात्याने जावेद अख्तर यांना घाईत बोलावले
जावेद अख्तर म्हणाले की, जेव्हा त्यांना हे गाणे लिहिण्यासाठी कालमर्यादा असल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्यांना वाटले की दिलेल्यावेळात ते काम करू शकणार नाही, परंतु त्यांनी अवघ्या दोन तासांत गाणे लिहून सादर केले. त्या क्षणाची आठवण करून देताना तो म्हणाला, आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना वाई येथे बोलावले, जिथे या चित्रपटाची शूटिंग सुरु होती आणि त्यांना सांगितले की संगीतकार एआर रहमान एक महिन्यासाठी परदेशी जात असल्याने पुढील १ ते २ दिवसात गाणे रेकॉर्ड करावे लागेल.
जावेद साहेबांचे भान हरपले
यानंतर जावेद अख्तर यांनीआशुतोष गोवारीकर यांना चित्रपटाच्या कथेबद्दल विचारले आणि तेव्हा चित्रपट निर्मात्याच्या उत्तराने तो आश्चर्यचकित झाला. हे गाणे कोणत्या सीनसाठी पाहिजे हे सांगताना निर्माते म्हणाले, हा सीन रामायणातून प्रेरित आहे, जेव्हा सीतेला रावणाने अशोक वाटिकेत नजर कैदीत ठेवले होते आणि रावण सीतेला विचारतो की ती रामाचे नावाचा जप का करते. तेव्हा प्रत्युत्तर देतान सीतेने रावणाला सांगितले की राम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ का आहे? हा सिन ऐकून मला भीती वाटली
'तुम्ही माझ्या हत्येची पूर्ण व्यवस्था केली आहे'
आशुतोष गोवारीकर यांचे म्हणणे ऐकून मी त्यांना म्हणालो, 'तुम्ही माझ्या हत्येची पूर्ण व्यवस्था केली आहे. हा किती संवेदनशील विषय आहे हे लक्षात येतेय का? रावण रामाविषयीचा सीताला विचारतोय आणि सीता उत्तर देतेय, तू मला या विषयावर हे गीत लिहायला सांगत आहेस? तुम्ही मला मुंबईत सांगितले असते तर मी निदान रामचरितमानस सारखी काही पुस्तके तरी आणून दिली असती आणि त्याचा अभ्यास करून मी गाणं लिहिलं असत.कारण त्या काळात राम मंदिर आंदोलन शिखरावर होते. मी त्याला सांगितले की मी हे करू शकत नाही.
पूर्ण गाणे २ तासात लिहिले
संभाषणात त्यांनी पुढे सांगितले की, मी सहसा उशिरा झोपतो, पण या गाण्यामुळे मी इतका तणावात होतो की त्या रात्री ९.३० वाजता झोपी गेलो आणि मग सकाळी उठलो. मला वाटले होते की मी प्रयत्न करेन आणि जर जमलं नाही तर मी आशुतोषला सांगेन मी प्रयत्न केला तरी मला गाणं लिहिता आले नाही.पण पुढील २ तासांनंतर मला समजले की मी गाणे पूर्णपणे लिहिले आहे. मग मी ते आशुतोष गोवारीकर यांना दाखव त्यांनाही ते आवडले आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनाही हे गं आवडलं म्ह्णून मी वाचलो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.