Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC: तारक मेहतामधील अब्दूल गेला कुठं? शो सोडल्याबाबत होतेय चर्चा; पण खरं कारण आलं समोर

Manasvi Choudhary

टिव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हि लोकप्रिय मालिका आहे. मागील १४ वर्षापासून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र मागील काही दिवसांपासून अनेक कलाकार या मालिकेतून बाहेर पडत आहेत. दयाबेनपासून ते गुरूचरणसिंग या कलाकारांनी मालिकेला राम राम केला आहे.

अलिकडेच तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गोलीची भूमिका साकारणारा कुश शाहने या मालिकेला राम राम ठोकला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबत माहिती दिली होती. त्यातच आता या मालिकेमधील आणखी एका कालाकाराने या मालिकेला निरोप घेतल्याचं बोललं जात आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत अब्दुलच्या भूमिकेत असणारा शरद सांकला मालिकेत दिसत नाही आहे. संपूर्ण गोकुळ धाम परिवार त्याच्या शोध घेत आहे. या मालिकेतून अब्दुल गायब झाल्यानंतर अनेक अटकळ्या लावल्या जात आहेत. दरम्यान, अब्दुलने मालिका सोडली असल्याचं अंदाज वर्तवला जात आहे.

काही दिवसांपूर्वी गोलीची भूमिका साकारणारा कुश शाहने जेव्हा शो सोडला तेव्हा देखील अशीच चर्चा होती. तो गायब झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. मात्र काही दिवसानंतर या मालिकेमध्ये नवीन गोलीची एंन्ट्री झाली. यामुळेच आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या नवीन भागात अब्दुल कोण असेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT