Dhurandhar The Revenge Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मध्ये पंतप्रधान मोदींचा खरोखरच कॅमिओ? व्हायरल सीनमागील सत्य आले समोर

Dhurandhar The Revenge: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे.आता त्यातील एका खास सीनमुळे तर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar The Revenge: आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह याच्या अभिनयाची जादू असलेला धुरंधर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकलाय. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची हाईप सोशल मीडियावर होतीच. चित्रपटात बडे साहबचा रोल कोण करणार? त्यापासून ते चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काय असेल, ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच होती. पण चित्रपट रिलिज झाला अन् सोशल मीडियावर मोदींचीच चर्चा सुरू झाली. होय.. कारण, धुरंधर २ या चित्रपटात मोदींचा कॅमिओ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धुरंधर चित्रपटाचे काही प्रसंग इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मोदींचं ऐतिहासिक भाषण दिसत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटातील काही सीन व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. या व्हायरल सीनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पंतप्रधान मोदी यांनी खरोखरच या चित्रपटात कॅमिओ केला आहे का? मात्र, सत्य थोडे वेगळे आहे. या चित्रपटात पंतप्रधान मोदी आहेत, पण प्रत्यक्ष रूपात नाहीत. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीनमध्ये मोदींचा कॅमिओ नसून, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी दिलेल्या भाषणाचे फुटेज वापरण्यात आले आहे. हे फुटेज स्टोरीमध्ये परफेक्ट बसल्यामुळे प्रेक्षकांना वाटत आहे की, या चित्रपटात पंतप्रधान मोदींनी कॅमिओ केला आहे.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटातून देशवासीयांची देशभक्ती जागी करण्याचे काम केले आहे. या चित्रपटात दाखवलेले प्रत्येक ट्विस्ट आणि सरप्राईज पाहून प्रेक्षक थक्क होत आहेत. प्रेक्षकांसह अल्लू अर्जुन, अनन्या पांडे, राम गोपाल वर्मा, प्रीती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

‘धुरंधर २’ हा फक्त ॲक्शन फिल्म नसून देशभक्तीपूर्ण अनुभव देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर, सौम्या टंडन, नवीन कौशिक आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Kairi Panha Recipe: कडाक्याच्या उन्हात प्या एक ग्लास कैरीचं पन्हं, पोटाला वाटेल गार

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगांव तालुक्यात “टाळा ठोको” मोर्चा

Mumbai death mystery: 'त्या' चौघांचा मृत्यू कलिंगडमुळे नाहीच; FDA च्या नव्या अहवालाने पेच अजूनच वाढला

भाजप नेत्याचा घरात आढळला मृतदेह, दोन पत्नींवर कुटुंबाचा संशय; नेमकं काय प्रकरण?

Mumbai Crime : आधी वीट मारली, मग गळा दाबला; वांद्र्यातील वृद्ध महिलेच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे सत्य समोर

SCROLL FOR NEXT