Twinkle Khanna And Akshay Kumar Love Story Instagram
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna Birthday: अक्षय कुमारबद्दल डिंपल कपाडियाला झाला होता गैरसमज, लग्नाआधी ट्विंकलनेही ठेवली होती विचित्र अट

Chetan Bodke

Twinkle Khanna And Akshay Kumar Love Story

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज (२९ डिसेंबर) ४९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज ट्विंकल खन्नाचा आणि वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

ट्विंकल खन्नाला जरीही जन्मजातच अभिनयाचा वारसा मिळाला असला तरी तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आहे. पण असं असलं तरी तिने बॉलिवूडच्या खिलाडीसोबत म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारसोबत १७ जानेवारी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. ती एक अभिनेत्री नसली तरी, ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डिझायनर म्हणून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. ट्विंकल आणि अक्षयची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षाही कमी नाही. मुळात त्यांचे लग्न एका अटीवर झाले होते. चला तर जाणून घेऊया त्यांच्या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल...

अक्षयची आणि ट्विंकल खन्नाची भेट एका मॅगझिन शूट दरम्यान झाली होती. शुटिंगच्या दिवशी ट्विंकलला पाहून खिलाडी अक्षय कुमार प्रेमातच पडला. अक्षय ज्या मुलीसोबत शुटिंग करतोय, त्या मुलीसोबत तो संसार थाटेल असं त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. शुटिंगनंतर ते एकमेकांना डेट करु लागले. त्यावेळी दोघं लग्न करतील असं कोणलाही वाटत नव्हतं. ज्यावेळी अक्षयला ट्विंकलसोबत लग्न करायचे होते. तेव्हा ट्विंकलने आणि ट्विंकलची आई डिंपल कपाडियाने अक्षयसमोर एक अट ठेवली होती.

त्यावेळी ट्विंकलचा 'मेला' चित्रपट रिलीज होणार होता, जर तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तरच ती अक्षयसोबत लग्न करेल, अशी ट्विंकलने लग्नासाठी अट ठेवली होती. पण अक्षयला ट्विंकलच्या चित्रपटाबद्दल खूपच अपेक्षा होत्या. त्याच्या सर्व अपेक्षा सपशेल चुकीच्या ठरल्या आणि तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २००० मध्ये रिलीज झाला होता. नंतर, ट्विंकल आणि अक्षयने २००१ मध्ये लग्नगाठ बांधली. 'मेला' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत ट्विंकलसोबत अमिर खानही होता.

ट्विंकल खन्नाच नाही तर, आई डिंपल कपाडिया यांनीही अक्षय कुमारसमोर एक अट ठेवली होती. डिंपल कपाडिया यांचा अक्षय कुमारविषयी काही गैरसमज होते. त्या गैरसमजामुळे तिने दोघांनाही लग्नाआधी एकत्र राहायला सांगितले होते. लग्नाआधी जेमतेम वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मागच्या सीझनमध्ये ट्विंकल खन्नाने, 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'अक्षय जेव्हा माझ्याकडे ट्विंकलसोबत लग्नाबद्दलची बोलणी करायला गेला होता तेव्हा मी अक्षयला गे असल्याचं गृहीत धरलं होतं म्हणूनच मी त्या दोघांनाही एकत्र राहण्याची अट ठेवली होती.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT