Aditya Pancholi Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aditya Pancholi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावरील बलात्काराचा गुन्हा रद्द होणार? २ आठवड्यांनी कोर्टात होणार सुनावणी

Aditya Pancholi Case: बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोलीने बलात्कार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आतापर्यंत 28 वेळा या प्रकरणात सुनावणी झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Aditya Pancholi Case: बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली यांच्याविरोधात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील एफआयआर रद्द करण्यासाठी त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात 28व्यांदा सुनावणी पार पडली. हे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असून, वारंवार तारखा पुढे जात असल्याने या खटल्याकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागून आहे.

आज झालेल्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य पंचोली म्हणाला की, 'हा मामला रद्द होण्याच्या मार्गावर आहे. हा मामला न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर अधिक काही बोलू शकत नाही आणि पुढे काय होईल ते 4 मार्च रोजी समजेल.

या प्रकरणात फिर्यादीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपांवरून आदित्य पंचोली याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या एफआयआरला आव्हान देत पंचोलीने न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आतापर्यंत तब्बल 28 वेळा सुनावणी झाली असूनही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रकरण लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होईल. तोपर्यंत हे प्रकरण प्रलंबित राहणार असून, एफआयआर रद्द होणार की नाही, याबाबतचा निर्णय त्या दिवशी समोर येण्याची शक्यता आहे. या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे केवळ बॉलिवूडच नव्हे तर सामान्य जनतेचेही लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT