Janhvi Kapoor Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Trolled : महापुरुषांवर भाष्य करणं जान्हवी कपूरला पडलं महागात; नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

Janhvi Kapoor Interview : अभिनेत्री जान्हवी कपूरने मुलाखतीदरम्यान तिने महापुरुष यांच्याविषयी भाष्य केले आहे. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या जान्हवी प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच जान्हवीने लल्लनटॉप वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाष्य केले. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर म्हणाली, "गांधी-आंबेडकर मुद्द्यावर होणारा वाद माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे. गांधी आणि आंबेडकरांचे एका विशिष्ट विषयावरून कसे विचार बदलले, त्यांना एकमेकांप्रती काय वाटायचे, दोघांनीही एकमेकांची कशी मदत केली, हे पाहणं मला आवडेल. दोघांनीही समाजाला खूप मदत केलेली आहे."

जान्हवी मुलाखतीत पुढे म्हणाली, "बाबासाहेब नेहमीच आपल्या विचारांवर ठाम राहिलेले आहेत. पण मला वाटतं महात्मा गांधी यांनी आपले विचार परिस्थितीनुसार बदलले आहे. कारण आपल्या देशात जो जातीयवाद आहे, त्यावर काहींचे दृष्टिकोन आणि त्याचे विचार यात बराच फरक आहे."

सध्या अभिनेत्रीची ही मुलाखत सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. जान्हवीच्या ह्या विधानामुळे नेटकरी तिला तुफान ट्रोल करीत आहे. 'तु तुझा विचार तुझ्या जवळंच ठेव, सर्वात आधी दोन्हीही व्यक्तींचा व्यवस्थित अभ्यास कर', अशी तिखट प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.

'तु फक्त अभिनयच कर, उगाच राजकारणात एन्ट्री करण्याचा विचार करू नको' अशा अनेक कमेंट्स अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. जानवीच्या या वक्तव्याचं काही व्यक्तींनी समर्थनही केलं आहे. तिने मांडलेल्या विचारांचं कौतुक काहीजण कौतुक करीत आहेत. पण यामुळे तिला चांगलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT