Sayaji Shinde News : 'आता चांगभलं म्हणण्यासारखी माणसं राहिली नसल्याची खंत अभिनेता सयाजी शिंदेनी व्यक्त केली. त्यानंतर आता माणसांच्या नावाने घोषणा देण्यापेक्षा वृक्षाच्या नावाने घोषणा द्यायला हव्यात, असं मत अभिनेता सयाजी शिंदेनी मांडत राजकीय नेत्यांना चिमटे काढले आहेत. (Latest Marathi News)
शिरुर तालुक्यातील वडगाव रसाई येथील देवराई वृक्षारोपण शुभारंभ अभिनेता सयाजी शिंदेच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सयाजी शिंदे बोलत होते.
'राजकीय नेत्यांना आपआपल्या पक्षांची काळजी करावी लागतेय त्यासाठी पैसा गोळा करुन आपली मतही बदलावी लागत असल्याचा गंभीर आरोप सयाजी शिंदेनी चिमटा काढला आहे. त्यामुळे आपल्याला आता उडाणाऱ्या पक्षाची काळजी घ्यावी लागणार आहे. पक्षी आणि झाडांचे चांगलं नातं असतं, त्यामुळे पक्षी आणि झाडांची काळजी घेतली की माणसंही नीट रहात असल्याचा टोमणा अभिनेता सयाजी शिंदेनी मारला आहे.
यावेळी सयाजी शिंदेनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून देश आणि राज्यात राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी झाड आणि पक्षी यांच्या संगोपनाचे गणित मांडल आहे.. आता येऊन येऊन येणार कोण असं झाडांशिवाय आहेच कोण ...! अशी घोषणाबाजी केली आहे.
कुठलाही पक्ष २०० वर्ष टिकत नाही, मात्र प्रत्येक झाड आयुष्यभर सावली देत त्यामुळे पक्ष नाही तर झाड टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच जनतेसमोर प्रश्न उपस्थित करत अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले कुठल्या मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार,खेळाडू,अभिनेते यांनी आज पर्यत सावली,ऑक्सिजन दिलेली पाहिलीय काय मग कशाला त्यांना सेलिब्रेटी करायचं असा सवालही सयाजी शिंदेनी उपस्थित केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.