विनोद पाटील, साम टीव्ही
मुंबई : शेअर मार्केटची घसरण थांबायला काही तयार नाही. मात्र याचा थेट फटका एसआयपी करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. नेमकी काय आहेत याची कारणं ? एसआयपीत गुंतवणूक करावी की करू नये? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याची मानली जाते. कारण त्यातली अनिश्चितता आणि त्यामुळेच एसआयपी आणि म्युच्युअल फंड हे तुलनेनं सुरक्षित गुंतलणुकीचा पर्याय मानले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची सातत्यानं घसरण सुरू आहे. आणि याचा थेट परिणाम आता एसआयपी आणि म्युच्युअल फंडावरही झालाय. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅपमधील गुंतवणूक तोट्यात गेलीय. याचा सर्वाधिक फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. त्यामुळेच अर्थ तज्ज्ञांनी एसआयपीतल्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय.
एसआयपी गुंतवणूकदारांनो सावधान!
- भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र
- घसरणीचा परिणाम एसआयपी गुंतवणूकदारांवरही
- एसआयपीद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक तोट्याची
- स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते
- लार्ज कॅपमधील गुंतवणूक ठरु शकते फायद्याची
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाच्या घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवलीय. त्याचाच देशी गुंतवणूकदारांना फटका बसलाय. यामुळे मात्र एसआयपीत गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात.
२०२४ हे शेअर बाजार, म्यच्युअल फंड आणि एसआयपीसाठी ऑल टाईम हिट ठरलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरूवातीलाच गुंतवणूकदारांना फटका बसलाय. अखेर हे शेअर मार्केट आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनो घाबरून जाऊ नका. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शन घ्या आणि गुंतवणूक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.