Amrut Kalash Yojana Saam Tv
बिझनेस

Amrut Kalash Yojana: फक्त ४०० दिवस गुंतवणूक करा अन् लाखो रुपये कमवा; SBI ची अमृत कलश योजना नक्की आहे तरी काय?

Siddhi Hande

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. नागरिकांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक बचत योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना फक्त ४०० दिवसांसाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश योजना ४०० दिवसांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी आता संपणार आहे.

एसबीआय अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. या योजनेची सुरुवात एप्रिल २०२३ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत.

अमृत कलश एफडी योजनेत तुम्हाला ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर दिले जाणार आहे. हे व्याजदर नियमित व्याजदरापेक्षा ३० बेसिस पॉइंट्सने जास्त आहे.

४०० दिवसांच्या अमृत कलश योजनेत भारतीय आणि NRI नागरिक दोघेही अर्ज करु शकतात. यात डिपॉझिट आणि रिन्यू अशा दोन्ही योजनांचा समावेश आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा कमी गुंतवणूकीवर टर्म डिपॉझिट लागू करतात.

या योजनेत ग्राहक मासिक, तिमाही आणि सहा महिन्यांच्या आधारे व्याज दिले जाते. टर्म डिपॉझिटवर मॅच्युरिटीच्या वेळी व्याजदर दिले जाते. मॅच्युरिटीनंतर ग्राहकांचे टीडीएस कापल्यानंतर हे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होतात.

टॅक्स सवलत

या योजनेत आयकर कायद्यानुसार टीडीएस कापला जातो. टीडीएसमध्ये सूट हवी असेल तर तुम्हाला फॉर्म 15G/15H जमा करावा लागेल. याचसोबत या योजनेत लोन सुविधादेखील दिली जाते.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योने अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन बुकींग करु शकतात. या योजनेत ३० सप्टेंबर २०२४ च्या गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: ग्रँड फिनालेपूर्वी 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात अभिजीतला मिळाली ट्रॉफी; निक्की म्हणाली, 'खुश राहा...'

Khatron Ke Khiladi 14 : 'किलर करणवीर' ठरला 'खतरों के खिलाडी 14' चा विजेता, ट्रॉफी मिळावी म्हणून केला होता अनोखा नवस

Ladki Bahin Yojana : अजितदादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकावलं; 'लाडकी बहीण' कार्यक्रमावरुन काय घडलं?

Krushi Vibhag Bharti: MPSC अंतर्गत कृषी विभागात भरती; २५८ रिक्त जागा;पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Chinese Garlic Video : बाजारात आलाय चायनिज लसूण; पाहा व्हायरल VIDEO मागचं सत्य

SCROLL FOR NEXT