Ashok Sahakari Bank RBI restrictions 
बिझनेस

राज्यातील या बँकेवर RBI चे कडक निर्बंध; ६ महिने सर्व व्यवहार बंद, ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ

Maharashtra Bank Crisis: अहिल्यानगरमधील अशोक सहकारी बँकेवर RBI ने २८ ऑगस्ट २०२६ पासून सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. नवीन कर्ज, नवीन ठेवी आणि खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध असून पात्र ठेवीदारांना DICGC अंतर्गत कमाल ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण लागू आहे.

Namdeo Kumbhar

Ashok Sahakari Bank RBI restrictions : राज्यात १३ शाखा असणाऱ्या श्रीरामपूर येथील नामांकित 'अशोक सहकारी बँके'वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुढील सहा महिन्यांसाठी बँकेचे सर्व वित्तीय व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बातमी वाऱ्यासारखी पसरताच आपल्या कष्टाची पुंजी काढण्यासाठी ठेवीदारांनी आणि खातेदारांनी बँकेच्या विविध शाखांसमोर मोठी गर्दी केली आहे.

बँकेवर नेमके काय निर्बंध आले आहेत?

रिझर्व्ह बँकेने लादलेल्या या निर्बंधांमुळे अशोक सहकारी बँकेला आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन कार्यालयीन खर्चाव्यतिरिक्त कोणताही मोठा व्यवहार करता येणार नाही. बँकेला नवीन कर्जवाटप करणे, इतरत्र कोणतीही गुंतवणूक करणे, नवीन ठेवी स्वीकारणे किंवा जुन्या ठेवींची रक्कम देणे यावर पुढील ६ महिन्यांसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

बँक संकटात येण्याचे नेमके कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण जमा ठेवींपेक्षा कर्जवाटपाची रक्कम अधिक झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बँकेकडे सध्या ३८० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, तर बँकेने तब्बल ४२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यात विशेषतः अहिल्यानगर येथील तीन शाखांमधून चुकीच्या पद्धतीने आणि विनाखातरजमा कर्जवाटप झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या कर्जदारांकडून वेळेत वसुली होऊ न शकल्यामुळे बँकेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून त्याचा मोठा फटका बँकेला बसला आहे.

ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार?

बँकेवर कारवाई झाल्याची माहिती मिळताच श्रीरामपूरसह इतर शाखांमध्ये खातेदारांनी पैसे काढण्यासाठी चक्रा मारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे संस्थापक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ठेवीदारांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

"बँकेचा परवाना रद्द झालेला नाही, त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. डिपॉझिट इन्शुरन्स (DICGC) नियमांनुसार ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना परत मिळतील," असा दावा भानुदास मुरकुटे यांनी केला आहे.

दरम्यान, अचानक लागलेल्या या निर्बंधांमुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडकले असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरात दुष्काळावरून ठाकरे गट आक्रमक! सरकारविरोधात जोरदार आंदोलन; ‘काजू-बदाम’ बैठकीवरूनही निशाणा

पंतप्रधान होणार की मुख्यमंत्रीच राहाणार? योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच दिली थेट कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

Cucumber Juice Benefits: काकडी

Serious Disease Warning Signs: कॅन्सरपासून किडनी फेल्युअरपर्यंत...; गंभीर आजार होण्यापूर्वी दिसतात 'ही' ७ लक्षणं

Ghee foot massage: रोज रात्री पायांच्या तळव्यांना 1 चमचा तूप लावा; फायदे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT