Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Post Office : पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वांसाठी खूप चांगल्या असतात. यामध्ये गुंतवणूक करणं खूप फायदेशीर असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त व्यास मिळतो.

Priya More

निवृत्त झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि तणामुक्त राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची थडपड सुरू असते. यासाठी ते आधीपासूनच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हे कधीही फायदेशीर असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसने एक जबरदस्त योजना आणली आहे. सरकार चालवत असलेली पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक विश्वासार्ह आणि आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. ही योजना विशेषतः ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना चांगले व्याज आणि कर सूट मिळते.

या वयातील नागरिकांसाठी फायदेशीर -

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेत गुंतवणूक करू शकतात. याव्यतिरिक्त ५५ ते ६० वर्षे वयोगटातील सरकारी कर्मचारी ज्यांनी VRS म्हणजे स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यचसोबत ५०-६० वर्षे वयोगटातील संरक्षण कर्मचारी देखील काही अटींसह या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये एकट्याचे किंवा पती-पत्नीच्या नावाने जॉईंट अकाऊंट उघडण्याची सुविधा देखील आहे.

जास्तीत जास्त ३० लाखांची गुंतवणूक -

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान १,००० रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत होती जी आता दुप्पट करण्यात आली आहे. ही योजना ८.२ टक्के वार्षिक व्याज देत आहे. जे बँकांच्या एफडीपेक्षा खूपच जास्त आहे. हे व्याज तिमाही आधारावर दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत ३० लाख रुपये गुंतवले तर त्याला वार्षिक २.४६ लाख रुपये म्हणजेच सुमारे २०,००० रुपये मासिक व्याज मिळेल.

१.५ मिळेल लाखांपर्यंत करसवलत -

या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळते. याचा अर्थ असा की, यामुळे नियमित उत्पन्न मिळत राहिल. याशिवाय कर वाचण्यासही मदत होते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा कालावधी ५ वर्षे आहे आणि गरज पडल्यास तो ३ वर्षांनी वाढवता येतो. जर गुंतवणूकदार वेळेपूर्वी पैसे काढू इच्छित असेल तर काही अटींसह पैसे काढता येतात. १ वर्षापूर्वी अकाऊंट बंद केल्यास कोणतेही व्याज दिले जात नाही. तर १-२ वर्षांच्या दरम्यान अकाऊंट बंद केल्यास १.५ टक्के व्याज कापले जाते आणि २-५ वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास १ टक्का व्याज कापला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT