LIC ने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर भविष्यात खूप फायदा होतो. या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा हा मिळतोच. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे जीवन उमंग पॉलिसी. (LIC Jeevan Umang Policy)
एलआयसी जीवन उमंग पॉलिसीत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. भविष्यासाठी ही गुंतवणूक खूप फायद्याची असते. या योजनेत ९० दिवसांपासून ते ५५ वर्षांपर्यंतचे नागरिक गुंतवणूक करु शकतात. ही गुंतवणूक लाँग टर्मसाठी असते. तुम्हाला मॅच्युरिटीनंतर हे पैसे मिळतात. या योजनेत मृत्यूनंतर पॉलिसीहोल्डरच्या नॉमिनीला रक्कम मिळते.
या योजनेत तुम्ही महिन्याला फक्त १३०२ रुपये प्रिमियम भरु शकतात. या हिशोबाने तुम्ही १५,२९८ रुपये गुंतवणार आहात. जर तुम्ही ३० वर्षांसाठी ही पॉलिसी सुरु केली तर तुम्हाला ४.५८ लाख रुपये मिळणार आहे.त्यानंतर ३१ व्या वर्षांपासून दरवर्षी तुम्हाला कंपनी ४०,००० रुपये देणार आहात. जर तुम्हाला ४०,००० रुपये दिले तर तुमच्याकडे २७.६० लाख रुपये मिळणार आहे.
या योजनेत तुम्हाला ३१ ते १०० वर्षांपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहे. या योजनेत रायडर बेनिफीटदेखील मिळू शकतो. म्हणजेच जर गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू झाला तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्हाला कलम 80C अंतर्गत सूट मिळणार आहे. या योजनेत २ लाख रुपये सिक्युअर करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.