मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना सर्वच महिलांसाठी खूप महत्वाची ठरली. यामध्ये पात्र महिलांना आत्तापर्यंतचे सगळ्याच हप्त्यांचा लाभ घेता आला आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये लाखो अपात्र महिलांनी अर्ज केले होते. मात्र पडताळणीनंतर ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित केल्या गेल्या. यामुळे सरकारला सर्वात जास्त फायदा झाला आहे.
राज्यात आता १ कोटी ७७ लाख बहिणी या पात्र ठरल्या असून ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. यासाठी सरकारला महिन्याला आता २ हजार ६५५ कोटी होईल. याआधी हा खर्च ३ हजार ६०० कोटी रुपये इतका होता. यामुळे सरकारला आता दिलासा मिळाला आहे. म्हणजेच सरकारचे आता एकूण दहा हजार कोटी रुपये वाचणार आहेत.
लाडक्या बहिणीच्या योजनेत गरीब आणि गरजू महिलांना १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. हा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा केला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून मार्च-एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार एकूण ३ हजार रुपये एकाचवेळी महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. तर हा हप्ता याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जर लाडक्या बहिणींना हप्ते येत नसतील तर तुमची ई-केवायसी झालेली नसू शकते. दुसरं कारण म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल किंवा घरात चार चाकी वाहनं असतील तर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत. अन्यथा सरकारच्या आय टी विभागाने अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.