RBI Report 2024 Saam Tv
बिझनेस

RBI Report 2024 : साडेचार कोटी नोकऱ्या; RBI च्या अहवालात नेमकं काय? वाचा

Siddhi Hande

भारत हा सर्वाधिक तरुणाई असलेला देश आहे. देशात सर्वाधिक उत्पादनांची क्षमता आहे. त्यामुळे देशात नोकरीची संधी उपलब्ध होणार गरजेचे आहे. देशातील २०२३-२४ आर्थिक वर्षात ४ कोटी ६४ लाख नोकऱ्या उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती दिली आहे.

Jobs In India

२०२३-३४ मध्ये रोजगारवाढीचा दर सहा टक्के होता, असेही आरबीआयने सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रोजगारवाढीचा दर ३.२ टक्के होता. हा दर आता वाढला असून ६ टक्के झाला आहे. देशात मागील आर्थिक वर्षात रोजगाराची संख्या ६४.३३ कोटी होती. हेच आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९.६८ कोटी होती. ही आकडेवारी बेरोजगारीचा दर तुलनेने जास्त असल्याचे दाखवत आहे.

सिटी बँकेच्या अहवालानुसार, जीडीपी सात टक्क्याने वाढल्यास ८०-९० लाख नोकऱ्या निर्माण होतील. देशात एक कोटी १० लाख ते २० लाख नोकऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे जीडीपी वाढीमुळेदेखील नोकऱ्यांची आवश्यकता पूर्ण होणार नाही, असे सिटी बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे.

सिटी बँकेच्या हा अहवाल कामगार विभागाने चुकीचा असल्याचे सांगितले आहे. २०१७-१८ आणि २०२१-२२ या कालावधीत दरवर्षी २ कोटींहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशातील बेरोजगारीचा दर २०२३-२४ मध्ये ८ टक्क्यांनी वाढला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षात हा दर ७ टक्के आणि ७.५ टक्के होता, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT