Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat Yojana : आजारी पडल्यास ५ लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार; काय आहे आयुष्मान भारत योजना? जाणून घ्या

Ayushman Bharat Card Yojana: केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात आयुष्मान भारत योजना एक आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात.

Siddhi Hande

केंद्र सरकार नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेत सरकार नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी मदत करते.

आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेत गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागेल. आयुष्मान कार्ड असल्यावरच तुम्ही हॉस्पिलमध्ये जाऊन मोफत उपचार घेऊ शकणार आहात.

पात्रता

या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. २०११ च्या जणगणनेनुसार, ज्या लोकांचा समावेश गरीब गटात झाला आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या व्यक्तींना ५ लाखांपर्यंतचा क्लेम मिळतो. रुग्णालयात झालेला खर्च या योजनेतून मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला Am I Eligible पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका. तिथे तुम्हाला ओटीपीभरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.यानंतर मोबाइल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही आयुष्मान कार्ज बनवण्यासाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल. आयुष्मान कार्ज बनवण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT