भारतात रेशन कार्डवर कमीत कमी किंमतीत रेशन मिळते. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत जीवनावश्यक गोष्टी मिळवून देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना गहू, तांदूळ,तेल अशा गोष्टी कमीत कमी किंमतीत होणार आहे.
देशातील कोट्यवधी लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही. तुमची एक चूक तुमचे रेशन बंद करु शकते.
या नागरिकांना मिळणार नाही रेशन
भारत सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. याबाबत सरकारने अनेक मुदती दिल्या होत्या. परंतु अजूनही अनेकांनी केवायसी केलेला नाही. त्यामुळे या रेशन कार्डधारकांना रेशन मिळणार नाही.
ई-केवायसी कसं करायचं? (Ration Card KYC)
रेशन कार्डधारकांना ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर लगेचच करा. अन्यथा रेशन सुविधा बंद होणार आहे.
केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जायचे आहे. त्यानंतर आधार कार्डच्या माध्यमातून केवायसी करायचे आहे. याचसोबत बायोमॅट्रिकदेखील करायचे आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेदेखील केवायसी करु शकतात.
रेशन कार्डधारकांना कोविडच्या काळात मोफत धान्य वाटप केले होते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळावी, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. रेशन कार्ड हे वेगवेगळे असतात. नारंगी, पांढरे असे वेगवेगळे रेशन कार्ड असतात. वेगवेगळ्या उत्पन्न गटातील नागरिकांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते. त्यानुसार, त्यांना मोफत धान्य मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.