rahul dravid | राहुल द्रविड
rahul dravid | राहुल द्रविड SaamTv
ब्लॉग

गोलंदाजांची कामगिरी चोख, फलंदाजीत सुधारणा हवी : राहुल द्रविड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सुनंदन लेले

मला वाटते की पहिला कसोटी सामना जिंकताना आपल्या गोलंदाजांनी फारच चोख कामगिरी पार पाडली. मान्य करावे लागेल की पहिल्या दिवशीच्या 3 बाद 272 धावसंख्येवरून आपल्या फलंदाजांना अजून मोठी धावसंख्या उभारता यायला हवी होती. म्हणून फलंदाजीत सुधारणा करायला हवी. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सारख्या दर्जेदार फलंदाजांनी मोठी खेळी करावी अशीच अपेक्षा असते. एक लक्षात घेतले पाहिजे की इथे फलंदाज कधीही पूर्ण स्थिरावत नाही कारण खेळपट्टी गोलंदाजांना सतत काहीतरी मदत करत असते, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दुसर्‍या कसोटी सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना मुद्दे मांडले.

हे देखील पहा :

विराट कोहली - अजिंक्य रहाणेची गडबड काय होतेय असे विचारता द्रविड म्हणा, प्रदीर्घकाळ खेळल्यावर असा काळ येतो की चांगली फलंदाजी होत असते पण मोठी खेळी होत नाही. चांगले फलंदाज आहेत हे सगळे जे नेहमी खूप मोठे ध्येय ठेवतात. याचा विचार करता हेच फलंदाज सर्वात उत्सुक आहेत मोठी खेळी करायला. मला आशा आहे तशी मोठी खेळी अगदी कोपर्‍यावर त्याची वाट बघते आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कार्यपद्धतीची स्तुती करताना राहुल द्रविड म्हणाले, विराट कमाल लीडर आहे. तो कष्टाला मागे पडत नाही आणि प्रक्रियेवर पूर्ण लक्ष देतो. त्यामुळे दौर्‍याअगोदरच्या बोलाचालीचा कणभरही परिणाम झालेला नाही आमच्या विचारात किंवा तयारीत झालेला नाही. त्याची शांतता ही वादळा अगोदरची शांतता वाटते आहे मला.

पहिल्या कसोटीत षटकांची गती न राखल्याने वर्ल्ड टेस्ट चँम्पीयनशिप स्पर्धेतील गुणतक्त्यात एका गुणाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. या बद्दल बोलताना द्रविड जरा सांभाळून बोलले. ते म्हणाले, नियम चूक बरोबर पेक्षा सगळ्यांकरता सारखे आहेत. षटकांची गती न राखल्याने 1 गुण गेलाय गेल्या सामन्यात वर्ल्ड टेस्ट चँम्पीयनशिप गुण तक्त्यातला. आम्ही चर्चा केली आहे. काय करायला लागेल हे ठरवले आहे. नियमाची अंमलबजावणी करताना दुखापती आणि गरम हवेमुळे थोडी गडबड होते याचा विचार थोडा झाला तर बरे वाटेल.

दुसर्‍या कसोटीच्या बाबत बोलताना द्रविड म्हणाले, हवामान चांगले आहे जोहान्सबर्गचे. विकेटही चांगले वाटत आहे. वाँडरर्सच्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी असते. हे विकेट असे आहे जिथे निकाल लागतो. आपले इथे रेकॉर्ड चांगले आहे इथले. माझे कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक याच मैदानावर झाले आहे जे मी कधीच विसरू शकत नाही. इथली खेळपट्टी वेगवान आहे पण उसळी त्रासदायक नाहीये. मला वाटते गोलंदाज उत्तमच मारा आहेत. त्यांना वेगळे काही सांगण्याची गरज नाही पडत आहे.

पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी पहिल्या आणि दुसर्‍या डावात वेगळ्या टप्प्यावर मारा केला याला कौशल्य लागते. वाँन्डरर्सला कसोटी सामना खेळताना फलंदाजांना शॉट सिलेक्शन म्हणजे फटके मारताना निवडायच्या चेंडूच्या अंदाजात सुधारणा करावी लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणीच भारतीय संघातील खेळाडू 1-0 आघाडीवर समाधान मानायचे नाही हे एकमेकांनाच बजावत आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यामुळे माझे काम सोपे होते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT