IND vs SA: माशी कुठं शिंकली; पंत-अय्यर राहिले पाहत 'जस्सी' बनला उपकर्णधार!

मात्र या दोघांऐवजी निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले आहे.
IND vs SA: माशी कुठं शिंकली; पंत-अय्यर राहिले पाहत 'जस्सी' बनला उपकर्णधार!
IND vs SA: माशी कुठं शिंकली; पंत-अय्यर राहिले पाहत 'जस्सी' बनला उपकर्णधार!Saam TV

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिका (SA) दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. असा निर्णय घेतला जाईल, असे कुणाला वाटले नव्हते, पण या खेळाडूने ज्या पद्धतीने स्वत:ला सिद्ध केले आहे, ते पाहता ही चाल योग्य वाटते. जरी त्याला उपकर्णधारपद फक्त एकाच मालिकेसाठी मिळाले असले तरी. पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार होण्याच्या निर्णयामुळे चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हे पाऊल उचलले आहे हे समजण्यासारखे आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyash Iyer) यांच्या रूपाने भारतीय संघात असे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये (IPL) कर्णधारपद भूषवले आहे. मात्र या दोघांऐवजी निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवले आहे.

IND vs SA: माशी कुठं शिंकली; पंत-अय्यर राहिले पाहत 'जस्सी' बनला उपकर्णधार!
31 डिसेंबर ऐवजी विकेंडला पर्यटक रायगडात; कोरोना नियमांची पायमल्ली

वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, "बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती करून, निवड समितीने पंत आणि अय्यरला संदेश दिला आहे की त्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी. बुमराहने पदार्पणापासूनच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये सातत्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. उपकर्णधारपद मिळणे हा सन्मान आहे. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "हे फक्त एका मालिकेचे आहे कारण रोहितचे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी परत संघात येणे जवळपास निश्चित आहे. त्यानंतर केएल राहूल उपकर्णधार असेल. तथापि, निवडकर्त्यांची इच्छा होती की बुमराह त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी आणि त्याच्या क्रिकेट खेळासाठी ओळखला जातो. या कारणास्तव त्याला पंत आणि अय्यरपेक्षा प्राधान्य देण्यात आले.

IND vs SA: माशी कुठं शिंकली; पंत-अय्यर राहिले पाहत 'जस्सी' बनला उपकर्णधार!
IPL 2022: नव्या हंगामात 5 गोलंदाज होणार मालामाल? 'या' भारतीय बॉलरवर नजरा

बुमराह उपकर्णधार का झाला हे प्रसादने सांगितले

या संदर्भात माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पीटीआयला सांगितले की, केवळ एका मालिकेसाठी उपकर्णधारपदाचा मुद्दा होता, त्यामुळे निवडकर्त्यांसाठी निर्णय घेणे सोपे होते. ते म्हणाले, जसप्रीत हा खूप हुशार खेळाडू आहे. मग त्याचा आदर का करू नये? मला हा निर्णय आवडला कारण तो सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असेल तर आपण वेगवान गोलंदाजाला कर्णधार का बनवू शकत नाही? जोपर्यंत तुम्ही त्याला नेतृत्व गटात समाविष्ट करत नाही तोपर्यंत जसप्रीत काय करू शकतो हे तुम्हाला कळणार नाही. तरीही, मी म्हणेन की ही केवळ मालिका आहे म्हणून निर्णय घेणे सोपे होते. जर रोहित आणि राहुल दोघेही नसते आणि कर्णधाराचा मुद्दा असता तर प्रकरण वेगळे असू शकले असते.

पंत-अय्यर उपकर्णधार का झाले नाहीत?

पंत आणि अय्यर यांना मालिकेसाठी दुर्लक्षित का करण्यात आले, असा प्रश्न प्रसादला विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले, मला वाटते की दुखापतीतून अय्यरचे पुनरागमन आणि पंतला एकदिवसीय आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज लक्षात घेऊन हे केले गेले. तसेच, मला विश्वास आहे की 2023 पर्यंत रोहित कर्णधार असेल आणि केएल उपकर्णधार असेल. पंत किंवा अय्यर यांना उपकर्णधार बनवणे म्हणजे ते नेतृत्व गटाचा भाग आहेत हे त्यांना सूचित करणे होय, परंतु प्रत्यक्षात प्रकरण वेगळे असू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com