बातम्या

राज्यात 1995, 2014मध्ये कसे होते खाते वाटप?

अशोक गव्हाणे

राज्यात दोन वेळा दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली होती. त्यात कोणती खाती कोणाकडे होती, यावर एक नजर टाकुयात.


राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाची संगीत खुर्ची सुरू आहे. जनतेने स्पष्ट बहुमत दिलेल्या भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्रिपदावरून उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष या खुर्चीवर दावा करत आहे. तर, या खुर्चीच्या बदल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती खिशात टाकण्याचा दोन्ही पक्षांचा इरादा दिसत आहे. या पूर्वी राज्यात दोन वेळा दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली होती. त्यात कोणती खाती कोणाकडे होती, यावर एक नजर टाकुयात.

संविधान भाजपची जहागिरी नाही, भाजपकडून महाऱाष्ट्राचा अपमान : राऊत

1995मध्ये शिवसेना मोठा भाऊ 
1995मध्ये राज्यात शिवसेनेच्या 73 तर, भाजपच्या 65 जागा त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यात दरारा होता. भाजपचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आघाडीवर होते. अगदी लालकृष्ण अडवानीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला मान देत होते. त्यामुळं खाते वाटपात फारसा संघर्ष झाला नाही. जास्त जागा असल्यामुळं सहाजिकच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडं गेलं. तरी देखील गृह सारखे महत्त्वाचे खाते आपल्याकडे घेण्यात भाजप नेते यशस्वी झाले होते. त्या सभागृहात 45 अपक्ष निवडून आले होते. हे देखील उल्लेखनीय आहे. अर्थात 2014मध्ये परिस्थिती बदलली आणि मोदी लाटेच्या जीवावर भाजपनं 123 जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळं 2014मध्ये शिवसेनेला नमतं घ्यावं लागलं. 

2014मध्ये शिवसेना धाकटा भाऊ


2014मध्ये शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली होती. पण, निकालानंतर सेना-भाजपने युती केली. त्यात भाजपनं 122 तर, शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. सरकारमध्ये मात्र शिवसेनेला कमी वाटा मिळाला. शिवसेना पक्ष प्रमुख असे पर्यंत युतीतील मोठा भाऊ म्हटला जाणारा पक्ष शिवसेना अचानक छोटा भाऊ झाला होता. त्यामुळं त्यांना खाते वाटपात, पर्यावरण, परिवहन, अशी कमी महत्त्वाची खाती मिळाली होती. भाजपने गृह, सार्वजनिक बांधकाम, महसूल, अर्थ ही मोठी खाती आपल्याकडेच ठेवली होती.

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

अर्थात, भाजपला जास्त जागा मिळाल्यानं शिवसेनेला मिळेल ती खाती घेण्यापलिकडे पर्याय नव्हता. पाच वर्षे शिवसेनेनं पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्या देत आणि राजीनामे खिशात ठेवून भाजपशी 'संसार' केला. पण, आता शिवसेना 2019च्या निकालानंतर आक्रमक झाली असून, मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवर आग्रही झाली आहे.

Web Title: Power Sharing Between Shivsena and BJP in 1995 and 2014

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Price : दर घसरल्याने कांदा उत्पादक आक्रमक; गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

पुण्यात भाजपने गेम फिरवला, अजित पवारांना जोरदार धक्का; राष्ट्रवादीच्या ३४ नेत्यांनी कमळ हाती घेतलं

Prajakta Mali: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Adinath Kothare: नशिबावर सगळं सोडून दिलं...; आदिनाथ कोठारे असं का म्हणाला? पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT