बातम्या

मणिपूर भारतापासून स्वतंत्र?लंडनमध्ये केली घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क

लंडन : मणिपूरचे राजे लैशेंबा सनाजौबा यांनी मणिपूर स्टेट कौन्सिल भारतापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा लंडनमध्ये केली आहे. राजे लैशेंबा यांच्या दोन प्रतिनिधींनी लंडनमध्ये रितसर पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत भारतापासून मणिपूरला स्वातंत्र्य मिळाल्याचा बॅनरही लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, केवळ दोघ व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन मणिपूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्याने हा प्रकार हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे.
 
मणिपूर स्टेक कौन्सिलचे मुख्यमंत्री यामबेन बिरेन, कौन्सिलचे परराष्ट्र आणि संरक्षण खात्याचे मंत्री नारेंगबाम समरजीत यांनी ही पत्रकार परिषद घेतली. मणिपूरचे महामहीम राजे लैशेंबा सनाजौबा यांच्यावतीने ही घोषणा करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मणिपूरचे हे सरकार हद्दपार सरकार असून, ते लंडनमधून चालवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मणिपूरमधील राजकीय परिस्थिती दुरुस्त करताना 15 मार्च 2013 रोजी देण्यात आलेल्या आदेश क्रमांक 12 नुसार त्यांना राजे लैशेंबा यांनी विशेष अधिकार दिले आहेत. दोन्ही नेत्यांनी सप्टेंबर 2019पासून लंडनमध्ये आश्रय घेतल्याचीही माहिती दिली. भारतीय लष्कराकडून अटक होऊन त्यांना जीवे मारण्याची शक्यता असल्याने त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली स्थिती जाहीर करण्यासाठी आणि मणिपूर स्वतंत्र असल्याची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही आजपासून संयुक्त राष्ट्र सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी मणिपूरच्या या हद्दपार सरकारच्या सार्वभौमत्वाला मान्यता द्यावी. 1958पासून लष्कराला मणिपूरमध्ये विशेष अधिकार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 

Web Title: only two leaders from manipur announces separation from India

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत हिंस्र प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला, शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

SCROLL FOR NEXT