बातम्या

आता राजधानी एक्सेप्रेस धावणार चार दिवस

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ते दिल्लीदरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावणारी प्रीमियम राजधानी एक्स्प्रेस आता चार दिवस धावणार आहे. या गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

आठवड्यातून दोन दिवस ती धावत असे. मुंबई ते दिल्ली हे अंतर २० तासांत ही गाडी पार करीत असे. मात्र, पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानंतर हे अंतर १६ तासांवर आले होते. परिणामी कमी खर्चात आणि कमी वेळेत दिल्ली गाठणे मुंबईकरांना सहज शक्य झाले होते. याशिवाय नाशिक, जळगाव, भोपाळ येथूनही या गाडीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या मार्गावर राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज निर्माण झाली होती. पश्चिम रेल्वेकडून नुकताच २० कोचचा रेक मध्य रेल्वेला उपलब्ध झाल्याने राजधानीच्या फेऱ्यांत वाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.जानेवारी महिन्यापासून मुंबई ते दिल्लीदरम्यान राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. 

मागणी असूनही फेऱ्या वाढविणे शक्य नव्हते. मात्र, आता दुसरा रेक उपलब्ध झाल्याने चार फेऱ्या करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या रेकमध्ये पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून केली जाणार आहे. या कामास एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने साधारणतः पंधरा दिवसांनंतर ही गाडी आठवड्यातून चार दिवस प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.आतापर्यंत एकच रेक उपलब्ध असल्याने केवळ दोन फेऱ्या होऊ शकत होत्या. 

Web Tittle:: Now the capital Express will run for four days


 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT