उल्हासनगर : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान अमरावतीतील हिंसाचाराचा निषेध मंत्री पाटील यांनी करुन गृहमंत्री वळसे पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे नमूद केले. gadchiroli amravati jayant patil naxals latest news
जयंत पाटील हे शनिवारी माजी आमदार पप्पू कलानी यांना भेटण्यासाठी उल्हासनगरात आले होते. यावेळी त्यांना अमरावतीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विचारलं असता, कुठल्याही हिंसाचाराचा निषेधच झाला पाहिजे, पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत, असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.
गडचिरोलीत पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल विचारलं असता ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असून महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.