मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. २१) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे मंगळवार मध्यरात्रीपासून शहरातील काही भाग अंधारात बुडण्याची भीती आहे.
शहरात बेस्ट उपक्रमामार्फत वीजपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी टाटा वीज कंपनीकडून वीज खरेदी करण्यात येते. वीज खरेदीबाबत टाटा आणि बेस्टमध्ये करार झाला आहे. बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत केलेल्या वीज खरेदीचे पैसे टाटा वीज कंपनीला दिलेले नाहीत. ही रक्कम तब्बल ५६१ कोटी ५८ लाख रुपये आहे. काही महिन्यांपासून बेस्टकडून पैसे देण्यात येत नसल्याने टाटाने २१ मे रोजी मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमाला विजेची विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निर्माण होणाऱ्या परिस्थितीस टाटा वीज कंपनी जबाबदार नसेल, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.
Web Title: Electricity Stop Mumbai Darkness Tata Power Best Bill Arrears
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.