बातम्या

शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडवणार 'टास्क फोर्स'

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वर्षाला शंभराच्या पुढे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होतात. यंदा सहा महिन्यांत 42 च्या आसपास आत्महत्या झाल्या. त्यावर उपायासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विविध यंत्रणांना एकत्र केले.

उपाययोजनांसाठी टास्क फोर्सचे प्रयत्न चालविले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक, विद्यापीठाचे कुलगुरू, सामाजिक अभ्यासक, अग्रणी बॅंकेसह विविध बॅंकांचे पदाधिकारी अशा सगळ्यांना एकत्र आणून हा टास्क फोर्स काम करणार आहे.

Web Title: Task Force Control for Farmer Suicide

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा कोल्हापूर वारी

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT