बातम्या

गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी'- ममता

सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे रक्षण करण्याबरोबरच लढाईही सुरू ठेवली पाहिजे.

25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी दोन वर्षांपर्यंत लागू होती. या दरम्यान सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्याला तुरुंगात टाकले जात होते. प्रेसवरही अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले होते. याबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आणीबाणीवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.

दुसरीकडे आणीबाणी स्मरण दिनानिमित्ताने ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यात अनेक पातळीवर संघर्ष झाला आहे. अशा स्थितीत ममता यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे काम पाहता, ते आणीबाणीपेक्षा कमी नाही. राज्याच्या कारभार त्या अतिशय वाईट पद्धतीने हाताळत आहेत. भाजपचा लोकशाहीवर विश्‍वास असून, त्याचे संरक्षण करण्यास बांधील आहे. 

- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

Web Title: Super Emergency in country from Last Five Years says mamta banerjee

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

SCROLL FOR NEXT