बातम्या

दिल्लीतील हिंसाचार हे गृह मंत्रालयाचे अपयश : रजनीकांत

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचाराच्या घटना हे केंद्र सरकारचे व गृह मंत्रालयाचे अपयश असल्याची जोरदार टीका दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी केली आहे.

ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांत झालेल्या हिंसचाराच्या घटनांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज (गुरुवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची यापूर्वी अनेकवेळा स्तुती करणाऱ्या रजनीकांत यांनी मात्र दिल्ली हिंसाचारावरून केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

रजनीकांत म्हणाले, की दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे. दिल्लीकर नागरिकांनाही संयम ठेवावा. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे. सीएए प्रभावित प्रत्येक नागरिकासोबत मी उभा आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. दिल्लीसाठी ही खूप दुःखद गोष्ट असून, सरकारला सुरक्षेची अधिक काळजी घ्यायला हवी होती. 

लेखक चेतन भगत यांनीही दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी केंद्राला जबाबदार धरत म्हटले आहे, की मोदी पाहुण्यांसोबत आहेत आणि दुसरीकडे हिंसाचार सुरू आहे.

Web Title Rajnikanth Blames Centres Intel Failure For Delhi Violence

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT