बातम्या

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर बारामती जिंकावीच लागेल : अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील, तर त्यासाठी बारामती जिंकावीच लागेल. तेथे विजयी मिळाल्यानंतरच ४५ जागा होतील, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे, बारामती आणि शिरूर या मतदारसंघांबाबत आढावा घेतला. यासह मोदी सरकारने केलेल्या योजनांविषयी माहिती देत विरोधकांवर जोरदार टीका केली.

शहा म्हणाले, की अयोध्येत त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर होणारच, त्यासाठी भाजप कटीबद्ध आहे. अयोध्येत मंदीर बांधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी राम मंदिराविषयी भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता, ना नीती आहे. देशात मजबूत सरकार केवळ मोदीच देऊ शकतात.

Web Title: BJP must win Baramati to help Narendra Modi get back to power, says Amit shah

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT