बातम्या

खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे - हितेंद्र ठाकूर

सकाळ न्यूज नेटवर्क

पालघर : भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते. तसेच खोटं बोलण्यात भाजप अव्वल आहे, असे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हितेंद्र ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, एकवेळेस साबण-तेल जाहिरात बघून घेतलं तर चालेल. पण पंतप्रधान जाहिरात बघून घेऊ नका. भाजपसोबत जो नाही तो देशद्रोही अशी भूमिका त्यांची आहे. जनतेने इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, स. का. पाटील यांचा पराभव केला होता. तर आता यांची काय अवस्था होऊ शकते? भाजप फक्त 
केकाटून, खोटं बोलण्यात अव्वल आहे. खोटं बोल पण रेटून बोल, असा भाजपचा अजेंडा आहे. 

भाजपने श्रीनिवास वनगा यांची वाट लावली. त्यानंतर भाजप-सेनावाल्यांनी योगीच्या नावाने शिमगा केला. सेनेला टोळा गुंड चालेल पण शंड चालणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP is on top for speaking lies says Hitendra Thakur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

SCROLL FOR NEXT