बातम्या

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये अप्रत्यक्ष मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ग्रामीण रोजगार, पर्यटन यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केले. मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण सरकारने अवलंबिण्याची गरज असल्याचे म्हटले.

बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2014 मध्ये राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. याच मुद्द्यावर कोल्हे यांनी लोकसभेमध्ये बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल असं मत कोल्हे यांनी लोकसभेत मांडले. ‘बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिलारी बैलांची पैदास ही दुष्काळग्रस्त क्षेत्रात होते. हे बैल पश्चिम महाराष्ट्रात विकले जातात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही या ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल,’ असे ते म्हणाले.

Web Title: Shirur MP Amol Kolhe talked about bullock cart race in Loksabha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT