बातम्या

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये अप्रत्यक्ष मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ग्रामीण रोजगार, पर्यटन यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत बोलताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केले. मंगळवारी लोकसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण सरकारने अवलंबिण्याची गरज असल्याचे म्हटले.

बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 2014 मध्ये राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. याच मुद्द्यावर कोल्हे यांनी लोकसभेमध्ये बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल असं मत कोल्हे यांनी लोकसभेत मांडले. ‘बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिलारी बैलांची पैदास ही दुष्काळग्रस्त क्षेत्रात होते. हे बैल पश्चिम महाराष्ट्रात विकले जातात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही या ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल,’ असे ते म्हणाले.

Web Title: Shirur MP Amol Kolhe talked about bullock cart race in Loksabha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ३५ लाख लाडक्या बहि‍णींचा हप्ता रखडणार, ₹१५०० न मिळण्याचे कारण आले समोर

Panchang Today: आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी! पंचांग, शुभ मुहूर्त आणि ‘या’ चार राशींसाठी दिवस लाभदायक

Maharashtra Live News Update: लोकसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

Palak Oats Tikki : घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी पालक ओट्स टिक्की, वाचा सोपी रेसिपी

UPI New Rules: UPIचे नियम बदलले! गुगल पे, फोन पे आणि पेटीएम युजर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT