औरंगाबाद : ''एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचे असेलत तर त्याला राज्य मागासवर्ग आयोगाने त्या समाजाला मागास घोषित करायला हवे. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग समितीने मराठा समाजाला मागास जाहीर केल्यामुळे या समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण दिले आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या विरोधात जरी कुणी न्यायालयात गेले तरी सरकारने बाजू मांडण्याची संपुर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल,'' असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.
मराठा आरक्षणावर प्रसार माध्यमांशी बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले, अनेक राज्यात पन्नास टक्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. पण एखादा समाज आरक्षणाला पात्र होण्यासाठी त्याला राज्य मागासवर्ग आयोगाने मागास घोषित करणे आवश्यक असते. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागसवर्ग आयोगाने आपल्या अहवालात मराठा समाजाला मागास घोषित केले आहे. या अहवालानूसार सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे".
WebTitle : marathi news maharashtra raosaheb danave on maratha reservation
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.