बातम्या

कट ऑफ वाढणार; अकरावी प्रवेशासाठी कांटे की टक्कर

सकाळ न्यूज नेटवर्क

दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी, पालकांसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय, तो म्हणजे अकरावी प्रवेशाचा. कारण यंदा अकरावी प्रवेशासाठी कट ऑफ वाढणाराय. त्यातल्या त्यात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तच चिंतेचं वातावरण आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. तेच एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिले गेले नाहीत, त्यामुळं इतर मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या आसपास आहे, तर दुसरीकडे एसएससी बोर्डात ९० पेक्षा जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २६ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळं नामांकित महाविद्यालयांतल्या अकरावी प्रवेश आता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणाराय. 

तर मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. दरम्यान आशिष शेलार यांनी या प्रकरणी दखल घेतलीय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार याची काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले.

दहावीचा पहिला मैलाचा दगड पार केल्यानंतर आता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर हा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उभा आहे, आता याप्रकरणी सरकारनं तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मदत करावी असा सूर उमटतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT