बातम्या

मुख्यमंत्र्यांना साप चावला असता तर... : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले होते. अधिवेशनाचा दिवस वाया गेला. पावसाचे पाणी काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी स्वतः गटारात झोकून बघावे लागले. रामगीर बंगल्यावर साप निघाला. मुख्यमंत्र्यांना साप चावला असता तर काय झाले असते. आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती. आज देखील नागपूर पाण्यात गेले आहे, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नागपुरात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे विधानभवनात पाणी घुसले होते. तसेच वीजपुरवठाही खंडीत झाला होता. त्यामुळे अधिवेशनचे काम न होता, अनेक नागरिकांचे हाल झाले होते. यावरून अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले.

अजित पवार म्हणाले, की नागपुरमधील पावसात दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीचेही एक चाक पाण्यात अडकले. त्यांनाही काही झाले असते तर... जबाबदार अधिकाऱ्यांना शासन झाले पाहिजे. जनतेचा पैसा असा वाया नाही गेला पाहिजे. अजून येथे पाऊस झाला तर काय उपाययोजना केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी स्वतः झोकून तुम्ही काम केले, हे सर्वांनी काम केले पाहिजे. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडायली हवी होती. विधानसभा अध्यक्ष जसे वाकून बघत होते, तसे इतरांनी झाकून ठेवण्याची गरज नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबां कसा ओळखायचा?

Kalyan Lok Sabha Election: उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घ्यायला सांगितला म्हणून अर्ज मागे घेतला - रमेश जाधव

SCROLL FOR NEXT