kadu 
बातम्या

दहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - बच्चू कडू

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे

अमरावती - कोरोनामुळे Corona दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता या दोन्ही इयत्तांचे निकाल कधी आणि कशा पद्धतीने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर निकाल संदर्भात शिक्षण विभागाकडून तज्ञांची एक कमिटी committee नेमण्यात येणार आहे. A committee of experts will be appointed for the result says Bachchu Kadu

या संदर्भातील मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू Bachchu Kadu यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांचे निकाल कशा पद्धतीने लावले जाणार आणि कधीपर्यंत जाहीर केले जातील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. 

हे देखील पहा -

याबाबत वेळेत निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंत्री बच्चू कडू यांनी तज्ज्ञांची कमिटी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निकालाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT