Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : पीक विम्याचे तीन लाखांवर अर्ज फेटाळले; शेतकऱ्यांच्या हाती निराशा

Yavatmal News : पावसाचा लहरीपणा तसेच बदलणाऱ्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असतो. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : नैसर्गिक संकटाच्या काळात पिकांना संरक्षण कवच आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी; यासाठी पीकविमा योजना सुरु झाली आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ उशिराने मिळत असतो. मात्र (Yavatmal) यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३ लाखांवर शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनीकडून फेटाळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) हाती आता काहीच लागणार नसल्याचे चित्र आहे. 

पावसाचा लहरीपणा तसेच बदलणाऱ्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असतो. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील आठ लाख ४४ हजार शेतकऱ्यांनी पाचशे कोटी रुपयांचा पिक विमा उतरविला आहे. यात काही शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याने कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत. 

निम्म्या शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले 

प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक प्रकोपाने हल्ला चढविला असताना या काळात विमा उतरविण्याचा प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवण्यासाठी मोठी अपेक्षा होती. मात्र विमा कंपनीने (Crop Insurance Company) त्यांची पार निराशा केली. ६ लाख १० शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानासाठी अर्ज दाखल केले. यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने फेटाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपनीने एक प्रकारे मोठा झटका दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT